जेव्हा जेव्हा प्रश्न कोणत्याही प्रकल्पग्रस्तांचा येतो तेव्हा माझ डोक एकदम फिरत.....आजही तसच झाल........स्टार माझा वर दुपारी १२ ते २.३० पूर्णपणे आजची जैतापूर ची सभा बघत होतो. प्रकल्पग्रस्त म्हणजे आम्ही काही गुन्हा केलेला असतो काय?? जैतापुरच्या जमिनीला म्हणे सरकार १० लाख रुपये देणार.........मी म्हणतो कि साला काय भीक देता काय??? १० लाख??? सध्या जमिनींचा भाव एकरी ४० लाखापासून पुढे चालू होतोय.........आणि जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी,त्यातील माणसांनी हा प्रश्न विचारला कि,"हा प्रकल्प तुमच्या बारामतीला किव्वा घाटावर का नाही नेत? तुमच्या कोयना,भीमा खराब होतील म्हणून का?? पण आमचा समुद्र खराब होईल त्याच काय?आम्ही मेलो तरी चालत?कि आम्ही महाराष्ट्रात राहत नाही?? कुठून तरी बाहेरच्या देशातून आलोत......" या प्रश्नांची उत्तरे का नाही दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी? तेव्हा का गप्प बसले. नुसत्या लोकशाहीच्या गप्पा मारू नये. मी हा विरोधासाठी विरोध करत नाही. कारण एक प्रकल्पग्रस्त म्हणून जगताना काय अडचणी येतात ते या सांगली,सातारा,कोल्हापूर इ. तस्तम पुढार्यांना काय समजणार? त्याचं काय जातंय बोलायला कारण शेवटी फायदा त्यांचाच होतो........कारण नंतर आमच्या परिसरातील जागांवर मेडिकल, इंजीनिरिंग कोलेज काढून दरवर्षी अब्जावधी कमावणार.......नवी मुंबई परिसरात काय चाललाय?? जमिनी आमच्या गेल्या. पण तिथे आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत कि कुठे पैशाशिवाय शिक्षणात प्रवेश दिला जात नाही. सर्व ठिकाणी यांचीच पिलावळ.........साला सर्व कॉलेजेस मध्ये हेच........ आता महत्वाचा मुद्दा आम्ही प्रकल्पग्रस्त जेव्हा या सरकारकडे आपल्या अभियांत्रिकी कॉलेज साठी जागा मागत होते तर ती देत नव्हते........मग या कदम,देशमुख.पवार इ. राजकारणी माणसांना कशी काय मिळते हे एक कोड आहे????? किती करोडो रुपयाचा सिडको आणि सरकार झोल करतेय........समजू शकेल का?????? डोनेशन च्या नावाखाली ५-६ लाख अभियांत्रिकी साठी आणि ५०-६० लाख वैद्यकीय(हा यावर्षीचा भाव होता.दरवर्षी तो वाढत राहतो.........दरवर्षी सरकारने ऑगस्ट, सप्टेंबर या प्कालावधीत एकाच वेळी सीबीआय चे छापे टाकावेत...........मग समजेल भारतात कला पैसा कुठून आणि किती तय्यार होतोय.............) साठी मागताना या चोरांना लाज वाटत नाही का?? साला जमिनी आमच्या आणि त्याच जमिनीवर आम्ही परके?????? जैतापूर वासियांच्या बाबतीत हे नको होण्यासाठी आमचा या प्रोजेक्टला नाही तर पुनर्वसनाला विरोध राहणार. जर सरकार त्यांना एकरी कमीतकमी ४० लाख, त्यांच्या घरातील प्रत्येक माणसला नोकरी, त्यांना अजून दुसरा रोजगार मिळवून देणे. त्यांना सरकारी वैदकीय आणि अभियांत्रिकी कॉलेजमध्ये मोफत प्रवेश आणि त्यांच्या प्रवेशासाठी काही अटी शिथिल कराव्यात, त्या परिसरात तिथल्या प्रकल्पग्रस्तांच मोफत औषधोपचार म्हणजेच सुसज्ज अस हॉस्पिटल. आणि तेथील प्रकल्पग्रस्त जनतेच्या सर्व मागण्या मान्य करत असेल तर जमिनी द्यायला विरोध होणार नाही. आम्हाला माहिती आहे कि हा प्रोजेक्ट चांगला आहे आणि या प्रोजेक्टला कितीही विरोध केला तरी तो होणारच आहे पण सरकारने आत्ता सामान्य जनतेला रडवू नये कारण सत्ता नेहमी बदलत राहते हेही लक्ष्यात असुदे...................प्रोजेक्ट होईल पण नंतर तुमची सत्ता राहील कि नाही तो मोठा प्रश्न आहे?????????आज लिबिया, इजिप्त या देशात काय होतंय ते पाहत असलाच.............जग जवळ येतंय...............आत्ता नाही तर पुढच्या १०-१२ वर्षात भारतात देखील हे होऊ शकत...........!!!!!!!!
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बोली-आगरी बाणा.
ekdam barobar mitra he sarkara apla nahich aahe
उत्तर द्याहटवाsale swatche khise bhrata fakta