
२३ मार्च,२०११ जे.एन.पी.टी बेमुदत बंद आंदोलन.............!!
हक्क मागून मिळत नसतो, तो लढा देऊन मिळवावा लागतो............!!
२३ मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनाला उरण,पनवेल,नवी मुंबई तसेच राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्त जनतेचा तसेच सर्व कामगार संघटनांचा भरभरून पाठींबा...........लढयापूर्वीच्या जनजागृती सभा, जे.एन.पी.टी कामगारांनी प्रकल्पग्रस्त जनतेच्या बाजूनी उभे राहण्याचा घेतलेला निर्णय तसेच प्रकल्पग्रस्त गावातील जनतेचं चालू असलेले उपोषण यामुळे प्रकल्पग्रस्त जनता पेटून उठली आहे.......... जर सरकारने २३ मार्च रोजी अथवा त्याअगोदर पोलिसी बळाचा वापर करून प्रकल्पग्रस्त जनतेला थोडा जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढून संपूर्ण नवी मुंबई परिसर बंद राहू शकतो...........याची नवी मुंबई परिसरातील सर्व नागरिकांनी सर्वानी नोंद घ्यावी.............
तरी सरकारला तसेच पोलिसांना एकच विनंती की, आम्हां सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांच्या वाटेत आडवे येऊ नका..........नाहीतर होणारे परिणाम लगेच दिसून येतील.........!!
"हुतात्म्यांच रक्त वाया जात नसत,
आम्ही ते वाया जाऊ देणार नाही"
"लाल सलाम.....लाल सलाम.......
हुतात्म्यांना लाल सलाम........."
आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा