आमोद पाटील-आगरी बाणा: डॉ.बाबासाहेब आंबेडकर

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

बुधवार, १३ एप्रिल, २०११

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

माझ्या विचारसरणीवर ज्या काही फार थोड्या नेत्यांचा प्रभाव पडला आहे. त्याच्यात आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच नाव देखील येत. लहानपणापासून पुस्तकात पाहिलेले अथवा चित्रपट माध्यमातून दूरदर्शन पाहिलेले बाबासाहेब माझे नेहमीच स्फुर्तीस्थान राहिले. समाजाविषयी काहीतरी करण्याची असलेली त्यांची जिद्द माझ्या आजच्या कार्यात मोलाची साथ देत आहे. भारतासारख्या आजघडीला १२१ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आहे.

पण आज काही स्वतःला शहाणे म्हणविणारे लोक ती राज्यघटना फाडून टाकायला सांगत आहेत. सर्वच बौल्लीवूड मंडळी ज्यांना देशाची जान नाही, अक्कल नावाची चीज नाही, पैशासाठी देशही विकायला काढतील असे लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करत असतात. अथवा सध्या भारतात सामजिक कार्यकर्त्यांचा सुलसुलाट झालाय(सुलसुलाट हा नेहमी उंदरांचाच होतो) ही मंडळी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून नसत्या उठाठेवी करीत आहेत. मेणबत्या पेटवून देश वाचवायला निघालेत. अश्या लोकानी अगोदर सरकारी कर न बुडविता तो भरावा, ज्या वेळी निवडणुका असतात त्यावेळी मतदान करण्यासाठी बाहेर यावं. सरकारने तुम्हांला सर्व उमेदवारांच्या विरोधात मत देण्याचा अधिकार दिलाच आहे. पण हे मेणबत्यावाले फक्त देशाच्या विकासाच्या गप्पा मारणार आणि पैसा कमवायला अमेरिकेची चाटणार. जर देशाची चिंता आहे ना तर निवडणुकीचा दिवस सुट्टीचा दिवस न मानता त्यादिवशी मतदान करावं. पण नाही हे मोठमोठ्या बाता मारणारे लोक मात्र तेव्हा कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी बायका-पोरांबरोबर देशाच्या भवितव्याची चिंता करत असतात. किव्वा मतदान केलंच(भारतातील जनतेवर उपकार करून) तर हे त्याचा योग्य मोबदला घेतात. ही मंडळी आपली मते विकतात. आता राहिला प्रश्न देशात निर्माण झालेल्या बाबा, गुरु, आध्यात्मिक गुरु, ताई, यांचा तर ही मंडळी निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष्यांकडून खूप प्रमाणात काळा पैसा घेऊन त्यांच्या भक्तीच्या मागे असलेल्या वेड्या श्रद्धाळू लोकांना अश्या लोकांना मतदान करण्यास भाग पाडतात. म्हणून तर ही राजकीय मंडळी आज या बाबाच्या पायरीवर तर उद्या त्या ताईच्या आश्रमात. अश्या चोर लोकांचा जे स्वतःच्या भल्यासाठी देशही विकतील अश्यांचा धिक्कार करून हा लेख मी बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
(१४ एप्रिल,१८९१- ६ डिसेंबर,१९५६)

शिक्षण · एम. ए. · पीएच. डी. · डी. एस्‌सी. · एल्‌एल. डी. · डी. लिट. बॅरिस्टर ऍट लॉ.

जीवन इतिहास:
जीवनक्रम
१८९१,१४ एप्रिल महू गावी जन्म.
१८९६ त्यांच्या आईचा मृत्यू.
१९०० नोव्हेंबर साता-याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
१९०४ एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
१९०६ रमाबाईंशी विवाह.
१९०७ मेट्रिक परीक्षा,
७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
१९०८ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
१९१२ डिसेंबर त्यांचा मुलगा यशवंत ह्याचा जन्म झाला.
१९१३ बी. ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले.
( पर्शियन आणि इंग्रजी विषय)
१९१५ जून एम. ए.ची परीक्षा पास झाले.
१९१६ जून कोलंबिया विद्यापीठातून पीएच. डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
१९१७ कोलंबिया विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली.
१९१७ जून लंडनहून भारतात एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१९२१ जून लंडन विद्यापीठाने त्यांना एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
(१४ एप्रिल, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - ६ डिसेंबर, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. सामाजिक आणि अर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या. दलितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झगडत राहिलेले नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गांव त्यांचे वडील हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचे वडिल हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी धरली. इथे त्यांना अस्पृश्य म्हणून अत्यंत कटू अनुभव आले. पदोपदी मानखंडना झाली. याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी ती नोकरी सोडली व मुंबईत सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. अस्पृश्यांचा उद्धार हेच त्यांनी आपले जिवितकर्तव्य मानले. त्यासाठी त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरुवात केली. १९२० मध्ये त्यांनी मुंबई येथून “मूकनायक”नावाचे पाक्षिक सुरु केले. कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगांव येथे त्याचवर्षी परिषद घेतली. नागपूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली. लोकजागृतीचे हे कार्य सुरू असतानाच, स्वत:चे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्णकरण्याकरिता ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी लंडन विद्यापीठाची डी.एस.सी. ही दुर्लभ पदवी संपादन केली. ते बॅरिस्टरही झाले. मायदेशी परतताच त्यांनी मुंबईत वकिली सुरु केली. सोबतच अस्पृश्य हिताचे आपले कार्य सुरुच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली. “शिकवा, चेतवा व संघटित करा”, हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

घरातून संस्कारांचे बीज
मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे सुपुत्र आणि डा. बाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेचा सॆन्यात शिपाई म्हणुन भरती झाले होते. सॆन्यातील नोकरीमुळे सॆनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षीत, संस्कारसंपन्न व द्न्यानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते. डॉ. आंबेडकरांचा जन्म
१४ एप्रिल इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ. स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला साधारण घरात राहीले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ. स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला! इ.स. १८९६ मध्ये भीमरावांची आई भीमाबाईंचा मस्तक शुळ या आजाराने दु:खद निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठया आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत. रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. याआधी इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.

अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ च्याबाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली. इ.स. १९२६ साली ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला. इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले. १९२६ साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला भरलेल्या महार परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधूंना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला. त्यामुळे हजारो लोकांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सुरुवात केकी. १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर इतरांप्रमाणे अस्पृश्यांनाही पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व याच वर्षी अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी “मनुस्मृती” जाळली. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे, म्हणून त्यांनी १९३० साली काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. त्यांनी “बहिष्कृत भारत”, “जनता”, “समता”, इ. वर्तमानपत्रांद्वारे अस्पृश्यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, वाईट चालीरिती सोडून देण्याची प्रवृत्ती व शिक्षणाची आवड निर्माण करुन त्यांचा स्वाभिमान जागृत केला.

पुणे करार
इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणर्‍या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले. इ.स. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना इ.स. १९३१ साली लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती. जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरूंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. तिथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू हिरिरीने मांडली. स्वतंत्र मतदारसंघाची त्यांची मागणी मंजूर झाली. त्यातूनच गांधी व आंबेडकर यांच्यांत मतभेद निर्माण झाले. गांधीजींनी उपोषण आरंभले. पुढे स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा ठेवण्यासंबंधीचा पुणे करार गडून आला. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापन केली. ते प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. १९४२ साली त्यांनी “ऑल इंडिया श्येड्युल कास्ट फेडरेशन” नावाचा देशव्यापी पक्ष स्थापन केला. या पक्षातर्फे त्यांनी अस्पृश्यांसाठी अनेक लढे दिले. १९४२ ते १९४६ पर्यंत ते व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. अस्पृश्यांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी ते सदैव प्रयत्न करीत राहिले.

राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्‍या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले. मुंबई कायदेमंडळात डा. आंबेडकरांच्या शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे काग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली होती. तोपर्यंत मुंबई कायदेमंडळांच्या काग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून ब. मुकुंद जयकर आणि के. एम. मुन्शी या दोघांची निवडही केली. त्यामुळे मुंबई कायदेमंडळाकडून डॉ. आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही. पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉ. आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. ब. जोगेन्द्रनाथ मंडल आणि बंगाल प्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यास यशस्वी झाले. ते प्रथम पसंतीची ७ मते मिळवून काग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले. अखेर डॉ. बाबासाहेब आबेडकर अस्पॄश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच. २० अगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांची नावेही जाहीर केली - डॉ. बी. आर. आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी. २९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सभासदाची ’मसुदा समिती’ नियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. पिपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत त्यांनी मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या शिक् णसंस्था दलित चळवळीच्या ऊर्जास्त्रोत बनल्या. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधिमंत्री झाले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अथक परिश्रम घेऊन त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते !

डॉ. आंबेडकरांचे धर्म विषयक दृष्टीकोण
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोणातून धर्मही मानवी संस्कृतीतून न टाळता येणारी बाब होती त्याच वेळी बर्‍याचशा सामाजिक असमानतानां धार्मीक परंपरा, रूढी आणि विचारधारा जबाबदार आहेत किमान पक्षी बर्‍याच वेळी विवीध धर्म संस्था समतेचे पाठह देत असल्यातरी खर्‍या अर्थाने त्या धर्मातील समाज समतेची पाठराक्षण करण्यास अयशस्वी झाला. भारतातील दलित समाजास जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेस हिंदू धर्म जबाबदार असून आपण हिंदू म्हणून जन्माला आलोतरी हिंदू म्हणून मरणार नाही असा दृष्टीकोण घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी विवीध धर्मव्यवस्थांचा अभ्यास केला. भारतात हिंदू धर्माशिवाय इतर बरेच इत्यादी धर्मीयांची भारतात दिर्घ काळ सत्ता मोठ्या कालखंडात असूनसुद्धा जातीव्यवस्थेत होणार्‍या दलित शोषणास थांबवण्यासारखे बाजू घेण्यास इस्लामी राजवटी आणि समुदाय कमी पडला,अशीच काहीशी परिस्थिती इतरही समतावादी समजणार्‍या धर्म समुदायांची होती. त्याशिवाय इस्लाम आणि इतर बर्‍याच धर्मातील स्त्रीयांना समतेची वागणूक न मिळण्याबद्दलही डॉ.बाबासाहेबांचे आक्षेप होते. सरते शेवटी बाबासाहेबांनी बुद्धधर्माचा स्विकार करून त्यांच्या अनुयायांनाही तसे करण्याचा सल्ला दिला. जातीसंस्थेमुळे हिंदूधर्म पोखरला गेला आहे. अशी त्यांची ठाम समजूत होती. धर्मांतर केल्यावाचून अस्पृश्यांवर होणारा अन्याय दूर होणार नाही, अशी पक्की धारणा झाल्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनेक अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यानंतर त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. वाचन आणि लेखन हा बाबासाहेबांचा श्वास होता. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही, असे त्यांना वाटे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२० व्या जयंती निमित्त आम्हां समस्त आगरी बाणा परिवाराकडून भारतीय राज्यघटनाकाराला मानवंदना आणि विनम्र अभिवादन. बाबासाहेब तुम्ही दाखविलेल्या सामाजिक एकतेच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न आम्ही आगरी बाणा मित्रपरिवार करत आहोत. तरी तुमच्या आशीर्वादाने आमच्या प्रयत्नास यश येवो हीच इच्छा.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा