आमोद पाटील-आगरी बाणा: दि.बा.पाटील साहेब जनजागृती करणार

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, ७ मे, २०११

दि.बा.पाटील साहेब जनजागृती करणार

माझे प्रेरणास्थान मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब
(फोटो-अनुप पाटील)


D.B.PATIL
Ex.M.P-KOLABA/RAIGAD
Ex.M.L.A-URAN-PANVEL
AGRI SAMAJ


प्रकल्पग्रस्तांकडून होणाऱ्या उधळपट्टीबाबत चिंता
प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळवून देण्याचे आंदोलन यशस्वी करणाऱ्या आपल्या लाडक्या आगरी वाघाने प्रकल्पग्रस्तांच्या उधळपट्टीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वारसांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे संकेत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्या निवासस्थानी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले आहे.

साडेबारा टक्के
राज्य सरकारने नवी मुंबईच्या उभारणीसाठी सिडकोमार्फत बेलापूरपट्टी आणि उरण-पनवेल तालुक्यातील हजारो एकर जमीन संपादित केली होती. यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक जमीन आगरी समाजातील शेतकऱ्यांची होती. भूसंपादानामुळेभातशेतीबरोबरच जोडव्यवसायही नष्ट झाल्याने येथील शेतकरी व त्यांचे वारस आता आपल्याच परिसरात दुसऱ्यांचे गुलाम होत आहेत. सरकारने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु केल्यापासून येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. माजी खासदार, प्रकल्पग्रस्त आगरी जनतेचे एकमेव नेते मा.श्री. दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली १९८४ मध्ये झालेल्या लढ्याने शेतकऱ्यांच्या जीवनाला कलाटणी दिली आहे. १९९० मध्ये महाराष्ट्र सरकारने नवी मुंबईकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय घेतला.

सुरुवात उधळपट्टीची
या निर्णयामुळे मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीलगत असणऱ्या विकसित जमिनींना मुंबईच्या खालोखाल किंबहुना अनेक ठिकाणी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जमिनींच्या बरोबरीने भाव मिळू लागला आहे. समाजात यापूर्वी लग्न व सार्वजनिक समारंभातून अवास्तव खर्च न करण्याच्या प्रथा होत्या, लग्नाच्या हळदी समारंभावर अनेक गावात बंदी होती; तर अनेक गावात सामुहिक लग्नसमारंभाची प्रथा होती. २० वर्षात या प्रथा आणि परंपरा मोडीत निघाल्या आहेत. अनेकांच्या हाती लाखो रुपये येऊ लागल्याने उधळपट्टी सुरु झाली आहे. आगरी समाजात लग्नात हुंडा देण्याची प्रथा नसली तरी आपल्याकडील श्रीमंती दाखविण्यासाठी मौल्यवान दागिने व वस्तू देण्याची प्रथा नव्याने रुजू लागली आहे. साडेबारा टक्केच्या आलेल्या पैशाची होणारी अवास्तव उधळण ही परिसरातील चर्चेचा विषय बनला आहे. ही उधळपट्टी चिंतेचा विषय असल्याने शेतकऱ्यांना करोडपती बनविणारे लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांनी समाजाच्या उन्नती व विकासाचे स्वप्न पाहिले असून आपल्या आयुष्याच्या उतरत्या काळातही समाजाचा विकास होण्यासाठी त्यांनी या उधळणीसंदर्भात जनजागृती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आगरी वाघाची डरकाळी आगरी छाव्यांसाठी प्रेरणादायक
पाटील साहेबांनी जनजागृती करण्याची व्यक्त केलेली इच्छा आम्हां आगरी बाणाच्या सर्व आगरी छाव्यांना प्रेरणादायक आहे. पाटील साहेबांच्या जनजागृती मोहिमेत आगरी बाणाचे सर्व आगरी छावे नेहमीच सामील आहेत. आगरी समाज एक झाला पाहिजे, आगरी समाज सुधारला पाहिजे, आगरी समाजातील सर्व वाईट रुढी-परंपरा, आगरी समाजात सध्या सुरु असलेल्या उधळणी विरुध्द आम्ही आगरी बाणाचे नव्या दमाचे, नव्या युगाचे आगरी छावे मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांबरोबर आहोत. पाटील साहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही आगरी बाणाचे आगरी छावे निघालो आहोत आगरी एकतेचा झेंडा घेऊन..................आगरी समाज सुधारण्यासाठी.............आगरी समाज एक करण्यासाठी................!!

"आगरी बाणाच्या, आगरी छाव्यांनी,
हाती झेंडा घेतलाय आगरी एकतेचा, दि.बा.पाटील साहेबांच्या विचारांचा"

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा