पलाट इकला त आमी काय काय करू
आगरी कवी, गायक, संगीतकार श्री.रामनाथ म्हात्रे यांच्या शब्दातून साकारलेली ही कविता. जो माझ्या सारखा सच्चा प्रकल्पग्रस्त आहे, त्याला या कवितेतील भावना लगेच समजतील. आपल्याच लोकांच काहीतरी चुकत आहे याची जाणीव होईल. लोकनेते.मा,श्री.दि.बा.पाटील साहेब यांनी अनेक वर्षे लढा देऊन, ५ हुतात्म्यांच बलिदान देऊन, आमच्या जासई गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व कर्ते पुरुष महिनाभर तुरुंगात राहून, जासई नाक्यावर, जासई दास्तान फाट्यावर, पागोटे येथे झालेल्या आंदोलनात अनेकांनी मार खाऊन हे १२.५% मिळालेत. याची जाणत या लोकांना नाही. मग लाज वाटते, अशी लोक स्वतःला प्रकल्पग्रस्त म्हणून "मिरवून" घेतात तेव्हा. "मिरवून" हा शब्द समर्पक आहे या लोकांना. बायकांच्या अंगावर किलो-किलो सोना, उंची दारूच्या बाटल्या, मोठ-मोठी घरे, लाखोचे साखरपुढे, लाखोच्या हळदी, लाखोचे लग्न.............लाज वाटली पाहिजे अशा लोकांना प्रकल्पग्रस्त म्हणवून घेताना.
पाटील साहेबांनी, माझ्या कुटुंबांनी, अनेक शेतकरी कुटुंबांनी जेव्हा सरकारने केलेले हाल सहन केले तेव्हाच तुम्हांला १२.५% मिळालेत. १९८४ च्या लढ्याच्या वेळी माझी आई गरोदर होती, पण त्याही परिस्थितीत अनेक स्त्रियांच्या बरोबरीने ती लढ्यात होती. वरून पाटील साहेबांच्या सुना म्हणून तर माझी मोठ्याई आणि आई दोघीनाही पुढे राहणे भाग होते. पण त्यावेळी तुमचे आत्ता मी-मी करणारे नेते ***** शेपट्या टाकून पळून गेले होते, जनतेला वाऱ्यावर सोडून. जनता मरत होती, रडत होती, हाल सहन करत होती. पाटील साहेब खंबीर होते म्हणून सर्व नीट झालं. पण हा वटवृक्ष जर त्यावेळी कोलमडला असता तर आजचे दिवस कोणाला पाहायला मिळाले नसते. आपला वटवृक्ष नेहमी खंत व्यक्त करतो, पण डोळ्यावर पैशाची, नशेची झापड लावलेल्या समाजाला त्यांची खंत कधीच दिसून आली नाही.
बाकी त्या सर्व मिरवणाऱ्या लोकांना एकच सांगतो की, ही तुमची स्वतः कमवलेली मालमत्ता नाही. दुसऱ्या कोणत्याही नेत्याने नव्हे तर फक्त आणि फक्त दि.बा.पाटील साहेबांनी तुम्हांला मिळवून दिलेली मालमत्ता आहे. थोडीशी जांची नाही तर मनाची लाज असेल तर सुधारा!!!! माझ्या माणसाचं रक्त गेलंय यासाठी. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची आमोद पाटीलला जाणीव आहे. म्हणून तो बोंबलतोय की आत्ता तरी सोडा हे सर्व, सुधारा.....जर भविष्य घडवायचं असेल तर सुधारा नाही तर चालू द्या...........दारू...........साखरपुढे............हळदी...........
पलाट इकला त आमी काय काय करू
पयल्या गारया झेव,घोरया झेव
एकीरेला जावून नवस फेरू
दोस्ताना झेवून फिरफिर फिरू
न पलाट इकला त आमी काय काय करू || १ ||
बार मदी जाव, दारू पीव
बारचे पोरीव लाईन मारू
त्यांचे बरोबर मज्जा करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || २ ||
सायटी झेव, न सप्लाय करू
शिरकोचे सायबाला दम भरू
प्री मान्सूनची काम नय दिली त तयाच मारु
न पलाट इकला त आमी काय काय करू || ३ ||
सायटीव जाव, न हाप्त झेव
हप्ता नय दिला त तंगरया तोरू
आवाज क्याला त शिरेस करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || ४ ||
शिवा देव, न दुश्मनी करु
दुस्मनांचे घराव डगरा मारू
ऐशा नाना प्रकारच्या आवकरन्या करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || ५ ||
श्री.रामनाथ म्हात्रे.
आगरी कवी, गायक, संगीतकार.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
आगरी कवी, गायक, संगीतकार श्री.रामनाथ म्हात्रे यांच्या शब्दातून साकारलेली ही कविता. जो माझ्या सारखा सच्चा प्रकल्पग्रस्त आहे, त्याला या कवितेतील भावना लगेच समजतील. आपल्याच लोकांच काहीतरी चुकत आहे याची जाणीव होईल. लोकनेते.मा,श्री.दि.बा.पाटील साहेब यांनी अनेक वर्षे लढा देऊन, ५ हुतात्म्यांच बलिदान देऊन, आमच्या जासई गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व कर्ते पुरुष महिनाभर तुरुंगात राहून, जासई नाक्यावर, जासई दास्तान फाट्यावर, पागोटे येथे झालेल्या आंदोलनात अनेकांनी मार खाऊन हे १२.५% मिळालेत. याची जाणत या लोकांना नाही. मग लाज वाटते, अशी लोक स्वतःला प्रकल्पग्रस्त म्हणून "मिरवून" घेतात तेव्हा. "मिरवून" हा शब्द समर्पक आहे या लोकांना. बायकांच्या अंगावर किलो-किलो सोना, उंची दारूच्या बाटल्या, मोठ-मोठी घरे, लाखोचे साखरपुढे, लाखोच्या हळदी, लाखोचे लग्न.............लाज वाटली पाहिजे अशा लोकांना प्रकल्पग्रस्त म्हणवून घेताना.
पाटील साहेबांनी, माझ्या कुटुंबांनी, अनेक शेतकरी कुटुंबांनी जेव्हा सरकारने केलेले हाल सहन केले तेव्हाच तुम्हांला १२.५% मिळालेत. १९८४ च्या लढ्याच्या वेळी माझी आई गरोदर होती, पण त्याही परिस्थितीत अनेक स्त्रियांच्या बरोबरीने ती लढ्यात होती. वरून पाटील साहेबांच्या सुना म्हणून तर माझी मोठ्याई आणि आई दोघीनाही पुढे राहणे भाग होते. पण त्यावेळी तुमचे आत्ता मी-मी करणारे नेते ***** शेपट्या टाकून पळून गेले होते, जनतेला वाऱ्यावर सोडून. जनता मरत होती, रडत होती, हाल सहन करत होती. पाटील साहेब खंबीर होते म्हणून सर्व नीट झालं. पण हा वटवृक्ष जर त्यावेळी कोलमडला असता तर आजचे दिवस कोणाला पाहायला मिळाले नसते. आपला वटवृक्ष नेहमी खंत व्यक्त करतो, पण डोळ्यावर पैशाची, नशेची झापड लावलेल्या समाजाला त्यांची खंत कधीच दिसून आली नाही.
बाकी त्या सर्व मिरवणाऱ्या लोकांना एकच सांगतो की, ही तुमची स्वतः कमवलेली मालमत्ता नाही. दुसऱ्या कोणत्याही नेत्याने नव्हे तर फक्त आणि फक्त दि.बा.पाटील साहेबांनी तुम्हांला मिळवून दिलेली मालमत्ता आहे. थोडीशी जांची नाही तर मनाची लाज असेल तर सुधारा!!!! माझ्या माणसाचं रक्त गेलंय यासाठी. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची आमोद पाटीलला जाणीव आहे. म्हणून तो बोंबलतोय की आत्ता तरी सोडा हे सर्व, सुधारा.....जर भविष्य घडवायचं असेल तर सुधारा नाही तर चालू द्या...........दारू...........साखरपुढे............हळदी...........
पलाट इकला त आमी काय काय करू
पयल्या गारया झेव,घोरया झेव
एकीरेला जावून नवस फेरू
दोस्ताना झेवून फिरफिर फिरू
न पलाट इकला त आमी काय काय करू || १ ||
बार मदी जाव, दारू पीव
बारचे पोरीव लाईन मारू
त्यांचे बरोबर मज्जा करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || २ ||
सायटी झेव, न सप्लाय करू
शिरकोचे सायबाला दम भरू
प्री मान्सूनची काम नय दिली त तयाच मारु
न पलाट इकला त आमी काय काय करू || ३ ||
सायटीव जाव, न हाप्त झेव
हप्ता नय दिला त तंगरया तोरू
आवाज क्याला त शिरेस करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || ४ ||
शिवा देव, न दुश्मनी करु
दुस्मनांचे घराव डगरा मारू
ऐशा नाना प्रकारच्या आवकरन्या करू
न पलाट इकला त आमी काय काय करू || ५ ||
श्री.रामनाथ म्हात्रे.
आगरी कवी, गायक, संगीतकार.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा