आमोद पाटील-आगरी बाणा: मंग आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, ३० जून, २०११

मंग आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची


आमचा बापूस पुनं आनचा न आमची आय येच गावांची,
मंग आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची????

प्रसिद्ध आगरी कवी पुंडलिक म्हात्रे लिखित हरकत काय तुमची ही कविता म्हणजे नवी मुंबई आणि जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांची सध्याची परिस्थिती वर्णन करणारी अशीच आहे. आम्हां शेतकरी आगरी कुटुंबियांच्या अनेक पिढ्या शेकडो वर्षे ज्या जमिनींवर शेती करत होते. तिच्यावर सरकारची काळी नजर पडली. आणि नवी मुंबई-उरण-पनवेल या पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ४० वर्षापूर्वी हिसकावून घेतल्या. तोंडावर फक्त काही रुपये फेकले. आश्वासन दिली गेली, स्वप्न दाखविली गेली......... तुमच्या पुढच्या पिढ्यांचा उद्धार होईल, तुम्ही खूप मोठी माणसे बनाल. पण आज चाळीस वर्षानंतर काय परिस्थिती आहे?????

लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांनी दिलेल्या लढ्यामुळे येथी आगरी माणूस जिवंत राहिला. त्याला काही प्रमाणात त्याचे हक्क मिळाले. पण जे काही हक्क मिळत होते त्यात आमच्याच अनेक चोर राजकीय नेत्यांनी अक्षरशः डल्ला मारला. ज्यांची लायकी नव्हती ते आज राजकारणाच्या फुशारक्या मारत आहेत. राजकारणी पण हेच अन् बिल्डर पण हेच. सिडको कडून भूखंडाचे श्रीखंड खाणारे पण हेच. सिडको घाटावरून आलेल्या राजकारण्यांच्या कॉलेजेसना भूखंड देते. पण प्रकल्पग्रस्तांच्या इंजिनिरिंग कॉलेजला मात्र भूखंड मंजूर केला जात नव्हता?????? आमचा समाज शिकू नये, पुढे जाऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे. तरी देखील सर्वांच्या नाकावर टिच्चून प्रत्येक क्षेत्रात आम्ही आहोतच...........तेदेखील स्वतःच्या हिमतीवर.........

पण आम्ही मात्र इथे आद्य नागरिक असून देखील आमच्या हक्कांची पायमल्ली केली जातेय. प्रकल्पग्रस्तांच्या जागी दुसऱ्याच लोकांची या जागेवर भारती केली जातेय. आमच्या पोरांना मात्र नोकऱ्या दिल्या जात नाहीत. त्याचं योग्य शिक्षण झालं असताना देखील नोकरी दिली जात नाही. पण हे चोर राजकारणी तसेच सिडकोत बसलेले अधिकारी, संचालक मंडळ बाहेरच्या लोकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नोकऱ्या देतेय, पण माझ्या माणसाला मात्र झुलवत ठेवलं जातंय. सर्व महत्वाची पदे या चोर राजकारण्यांच्या घरात त्यांना वाटेल तस ते आगरी जनतेचं वापर करून घेत आहेत.

ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे सिडको अनधिकृत ठरवून सिडको त्याच्यावर जेसीबी चालवतेय. तेव्हा मात्र हे राजकारणी कोणत्या बिलात जाऊन लपतात तेच समजत नाही. तर मग आम्हां सर्व तरुण आगरी प्रकल्पग्रस्तांना प्रश्न विचारावासा वाटतो की, आमाला नोकरीला लावाला हरकत काय तुमची???????????

जमीन आमच्या हक्काची,
नाही कुणाच्या बापाची

हरकत काय तुमची

आमचा बापूस पुनं आनचा आमची आय येच गावांची,
मंग आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची????

आवारे वारसां बाबा राजकारणात व्हता
सोतासाठी काय बगतुचा नवता
पकक्षा साठी आयुष घालवला
शेवटी शेवटी पाणी डोळ्यांशी आला
खुटावाले कावळ्यांनी पाय काय दैना उरवातव आमची || ||

कनचापून राजकारणी यातन
नय नय त्या उलट सुलट तुमा सांगतान
मतलबा साठी लय जमतान लोका
चार पाच लाखांसाठी चालवतान डोका
पाखर तरी कैशी करताव तुमी ये राजकारणाची || ||

खारे म्हलानानच ये रानाना आमी
मिठाची अन मावरा काट्याची भूमी
वार वरलांच्या कती जेल्या पिऱ्या
खोट्यांचे होट -याचे बे-या
गंगा दरांशी येऊन आमचे पाणी धाय धाय डोळ्यांशी || ||

गाववाल आसून आमी भिक मागतून
गोर बंगाल काय त्या अमिपून समजातून
परके लांडग्यांच ते सवसार चंगळ
प्रकल्पग्रस्तानच सपान भंगल
ज्यांचा संमंद नय कारीचा पोरा कामाला त्यांची || ||

इतिहास बगलावं नय तरी आयाकावा
काय काय आयाशी घडलाय त्या बगावा
कती आयाशी पा चोराव मोर
कोणाचे जीवाव ती नाचे लांडोर
कुंडलिक सांगतोय घरलेली कहाणी प्रकल्पग्रस्तानची || ||

कवी-पुंडलिक म्हात्रे.

आगरी कवी पुंडलिक म्हात्रे यांचे आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉग तर्फे मनापासून आभार.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा