आमोद पाटील-आगरी बाणा: आपणा सर्वांचे धन्यवाद................. -AMOD PATIL(AGRI BANA)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

आपणा सर्वांचे धन्यवाद................. -AMOD PATIL(AGRI BANA)







धन्यवाद वाचक संख्या २० हजार.........................
आज आपल्या ब्लॉगची वाचक संख्या २० हजाराच्या उंबरठ्यावर आहे...............लवकरच आपण २० हजाराचा भेटींचा आकडा पार करू..............आज या २० हजाराच्या आपल्या सारख्या खूप जणांची मनापासून साथ लाभली.................. आपण दाखविलेले प्रेम आणि आपुलकी यामुळे आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद.................तसेच आपल्या ब्लॉगच्या फेसबुक पेजला दिलेला चांगला प्रतिसाद त्यामुळे पेजचे लाईक करणाऱ्यांची संख्या २००+ झाली आहे. आता म्हणाल की, धन्यवाद का?????? तर वरती त्या चित्रामध्ये अतिशय साध्या सोप्या शब्दांत त्याचं स्पष्टीकरण दिले आहे............... आपला ब्लॉग नक्की का तयार झाला याला अनेक कारणे आहेत...............२० हजाराच्या या प्रवासात खूप चांगले-वाईट अनुभव आले................त्यातील काही आज आपणास सांगताना मन आनंदित आहे.............


ब्लॉगची सुरुवात...................
२००७ साली गुगलवर मी "AGRI SAMAJ" असा सर्च दिला...................पण त्यावेळी मला अजूनही आठवतंय.............पहिल्या पेजवर ५ नंबरला अतिशय वाईट अशी सर्च सापडली.............गुगलच्या एका ग्रुपमध्ये एका पांढरपेश्या मुलीने लिहील होत................."मी इथे नवी मुंबईत बेलापूर मध्ये (*** टावर) नोकरी करते...............माझ्या ऑफिस मध्ये इथल्या स्थानिक आगरी तरुणांची संख्या खूप आहे............ते पेण, उरण, पनवेल, कर्जत, नवी मुंबई ग्रामीण भाग येथून येतात..............त्यांना म्यानर्स नावाची काही गोष्ट माहित नाही..........ऑफिस मध्ये कसं वागतात याचं त्यांना अजिबात ज्ञान नाही...............डब्यावर मासे आणतात आणि त्याचा वास ऑफिस मध्ये पसरवतात...........आम्हांला त्याचा त्रास होतो..............या घाणेरड्या माणसांना नवी मुंबई सारख्या पौश एरियातून कोणीतरी हटवा...................." नंतर काही महिन्यानंतर ग्रुप बंद झाला..............करण्यात आला...............
पण त्यानंतर मात्र डोक विचार करायला लागलं होत.................कारण त्याचवेळी ऑर्कुटवर मोठमोठे आगरी ग्रुप फक्त समाज विकासाच्या मोठमोठ्या बाता मारत होते..............त्यांच्या नजरेस ही गोष्ट त्यावेळी पडली नव्हती????? की ते फक्त उगाच टाईमपास करायचा, पोरी पटवायच्या म्हणून तिथे होते...............?????
पण नंतर माझ्या १२ वीच्या अभ्यासामुळे इंटरनेट हा विषय बाजूला राहिला..........CET च्या परीक्षेनंतर पुन्हा इंटरनेटवर रुजू झालो..............आणि फेसबुकवर अकाऊंट ओपन केलं..........२.५ - ३ वर्षापूर्वी फेसबुकवर इतकी गर्दी अजिबात नव्हती.............आंम्ही मोजकेच होतो..............म्हणजे सरासरी १०००० पोर ऑर्कुट तर फेसबुकवर फक्त १००.............मग तिथे टाईमपास करता करता लक्षात आलं हे तर लय भारी माध्यम आहे...............तिथे खूप वेळ गेला............गेल्यावर्षी जुलै मध्ये ब्लॉगर विषयी बातमी वाचली.................आणि..................."हेच ते जे आपल्याला हवं होत................बस मनात विचार पक्का..............आपण इथे सुरुवात करायची...............काहीही होवो...................पुढचे ४-५ दिवस विचार केल्यानंतर इथे ब्लॉग तयार करण्यात आला.....................आणि खऱ्या अर्थाने माझी सुरुवात झाली.................नाव मात्र रात्री झोपायच्या अगोदर सहज मनात येऊन गेलं................आणि रात्रभर त्याचा विचार चालू होता..............शेवटी ठरलं..................आगरी बोली-आगरी बाणा........."

प्रश्न अनेक होते, समाजाची असलेली वाईट ओळख पुसायची होती, त्यासाठी सर्व आगरी तरुणांनी एक व्हावे हा विचार होता..............आणि त्यातून फेसबुकवर तयार झाला आगरी बाणा ग्रुप..............त्यावेळी फेसबुकवरच्या अनेक प्रस्थापित आगरी पेजेसना रिक्वेस्ट केली होती................की चला सगले एक होऊ...................पण अपवाद वगळता अनेकांनी उत्तर दिलेच नाही.................आणि मग नंतर झाली या ऑनलाईन ग्रुपची आतापर्यंतची एकमेव मिटींग...............ही आमची शेवट नाही..............सुरुवात आहे..............आम्ही पुन्हा भेटणारच..............इथे भेट द्या-आगरी बाणाची पहिली बैठक. त्यात ठरलं होत की, आपण संघटना तयार करुया............संघटना तयार करायला हरकत नाही.................पण मला स्वतःला शैक्षणिक कामातून वेळ भेटणे अवघड आहे................आणि वरून संघटनेला नेतृत्व तुझचं हवं ही अट................काय करावं????? पण या मिटींग मधून एक शिकलो.................ऑनलाईन अनेकजण टीव टीव करतात................आम्ही समाजासाठी हे करू, ते करू..................पण जेव्हा खरोखर भेटण्याची, काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ही मंडळी गायब होतात.............आणि खरे काम करणारेच अशावेळी पुढे येतात. नुसतं ऑनलाईन सिंह, राजे बनून काही होणार नाही.....................ऑनलाइन भुंकता की डरकाळी फोडता याला काहीच अर्थ नसतो..............आज अंदाजे ४० लाख लोकसंख्या असलेल्या समाजाला आपली गरज आहे....................तुमच्या ऑनलाइन वटवट केल्याने काही होणार नाही..................समाजासाठी काही करायचं आहे तर रस्त्यावर एकत्र येण्याची तयारी दाखवा.....................मनापासून काम करणारे १०-१२ जण येणार आणि बाकी फक्त आम्हांला पण समाजासाठी काहीतरी करायचं आहे अश्या बतावण्या करणार. भविष्यात वेळ भेटेल तेव्हा पुन्हा अश्या भेटीचा योग जुळवून आणणारच.......................बोलण्यासारखं बरचं आहे.......................पुढे बोलूच.....................बाकी हे सर्व घाईघाईने लिहीत असल्याने विस्कटीत वाटू शकत..................तरी गोड मानून घ्या..................


पुन्हा  एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार..................जाता-जाता एकच विनंती...............जातीयवादी, भाषिकवादी, प्रांतवादी, धर्मवादी भेदांपासून लांब राहा.......................जो आपल्याबरोबर तो आपला...............मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, प्रांताचा असो, भाषेचा असो...............आपण सर्व भारतमातेची लेकरे आहोत.............भारत माझा देश आहे...............आणि सारे भारतीय माझे भाऊ आहेत..............


आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा