आमोद पाटील-आगरी बाणा: निवरनुका यणार हायीत............

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

निवरनुका यणार हायीत............



पुढील वर्षभर आपल्या परिसरात अनेक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोणाला मत द्यायचं आणि का द्यायचं हे आत्ताच ठरवा. "आगामी काळात येणाऱ्या निवडणुकात कोणत्याही राजकीय पक्षाला माझं मत विकणार नाही, टाकणार नाही. मत त्यालाच देईन जो माझा असेल. अन्यथा नकाराचा अधिकार वापरून सर्व उमेदवारांच्या विरोधात मत देणार." ही शपथ आपण सर्वानी घेणे खूप गरजेचं आहे. "नकाराचा अधिकार-सरकारने आपल्याला हा अधिकार दिलाय. याचा वापर करून आपण आपलं मत देऊ शकतो. पण ते सर्वांच्या विरोधात." कारण ५०० रुपयाच्या एका नोटेसाठी पुढची पाच वर्ष आपण भंगार प्रतिनिधी निवडून पाठवतो. भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. नुसतचं बोलून काही होणार नाही. एकदा निवडून आल्यावर कसे आपल्या "गा@#$%" लात मारतात हे आपण पाहतोच. तेव्हा आपण आपली कामे करायला गेलो तर ते सांगणार, निवडणुकीच्या अगोदर पैसा दिलाय...............आत्ता सोच अपनी अपनी निवडणुकीच्या अगोदर एकदाच मिळणारे ५०० रुपये हवेत की विकासकामे???? लक्षात ठेवा हे राजकारणी आपले सेवक आहेत मालक नाहीत. जर या राजकीय व्यवस्थेत बदल हवा असेल तर आपल्यातला कोणीतरी या राजकीय व्यवस्थेत खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम-पंचायत सदस्य म्हणून पाठवायला हवा. नाहीतर राजकीय घराणेशाही चालूच आहे.............आपण पाहतो आहोत..........बाप झाल्यावर पोरगा..............पोरगा झाल्यावर पुतण्या...............नंतर नातू..............मुलगी...............अस हे प्रकरण वाढत जाते..............हे नव्या युगाचे राजे म्हणून वावरतात..............यांची लायकी तर काडीचीही नसते.............तरीही बापाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या जीवावर कमवलेल्या पैशातून हे असे बिनडोक लोक पुन्हा निवडून येतात...............याच्या सुरस कथा खूप आहेत पण जाऊदे................कारण आपली माणसेच निवडणुकीच्या वेळी पैसे घेऊन मते विकतात...............त्यात या बिचार्यांचा काय बर दोष????? बघा पटल तर घ्या नाहीतर जाऊद्या............. मत विका, मत देऊ नका आणि नंतर विकासकामांच्या नावाने बोंब उठवा.............


आयशा कती पिर्या जातीन, न आया कोनचे कोन म्होट व्हतीन
आर आर परकल्पग्रस्ता कवा तुज नशीब उगारतीन ||धृ||

यो सिवसेनेचा तो शाका पक्षाचा
राष्ट्रवादी न आय कांग्रेसचा
भाजपाचा न मनसेचा
बाजार मांडलाय ये आमचे काले आयचा
परकल्पग्रस्त म्हणून कवा सगलं तुजे कर पातीन????||१||

जो तो सांगतंय आमचे कर या व्ह
काय आमी करतून त्या सगल्याई बगा व्ह
सामील नय आमच्यान त कैसा तू समाजांचा
यावार काय हाय तो खऱ्या खोट्याचा
नीट इचार करुन्सी जा, नै त फुकट आफट्या पारतील||२||

मता आली का बग नै नै ते येतीन
कय बय सांगूनशी डोका आवूटूच करतीन
आमचे सारा कोन नय तुला भासवतीन
तुजा वारलेला ठावला तेच खातीन
कोनला कोयत्याशी नाय तुटणार, पुनते केसान गला कापतीन||३||

राजकारन्यांची त आवरी दुकाना
कंचे जा तरी पलसाला तीन पाना
ठरलेला सगळ्यांचा यकुच हुकाना
आमचे सार व्हा नैत मोरू माना
कुंडलीकाची त मोरलीय शाप मंग तुजी बरी ठेवतीन????||४||
कवी-पुंडलिक म्हात्रे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा