आमोद पाटील-आगरी बाणा: वैलेंटाइन डे (break up ke baad)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१२

वैलेंटाइन डे (break up ke baad)



मन्या खुष झाला होता कारण वैलेंटाइन डे जवळ येणार होता. आपण तिला प्रपोझ मारणार आणि ती आपल्याला हो बोलणार या कल्पनेने तो सुखावला होता. गेले काही दिवस तो मस्त मुड मध्ये होता. तसा मन्या बारावी पास पण त्यापुढे शिक्षणाचा खास करून इंग्रजीची भितीने त्याने शिक्षणाला रामराम केला होता. तेव्हापासून कडक इस्त्री केलेले शर्ट-पैंट घालून नाक्यावर उभे राहणे, सिगारेट फुंकणे असे आयुष्याचा वेळ वाया घालवण्याचे प्रकार तो करू लागला होता. अचानक एके दिवशी त्याला मनी दिसली. लहानपणी तिला पाहिलेली. तिच्यात झालेला बदल पाहून मन्या प्रेमात पडला मनी मन्याच्याचा मोहल्यात राहणारी , रोज सकाळी उठून कॊलेजात जाणारी. तर मन्या रोज सकाळी उठून नाक्यावर उभा राहणारा. दिवसांमागून दिवस जात होते. मन्या मनीला पाहत होता, मनी मन्याला पाहत होती. पण साला मन्याची तिला विचारण्याची हिंम्मत होती. आता काय करावे हा प्रश्न मन्याला सतत सतावत होता ? मग त्याला त्याच्या
नाकेकरी मित्राने सल्ला दिला "अरे मन्या, वैलेंटाइन डे जवळ येतोय. विचारून टाक, हो बोलेलच. यावेळेला कोणीही नाही म्हणत नाही, बिंनधास्त जा. लाईन पक्कीच...." मित्राच्या या बोलण्याने मन्या सुखावला होता, त्याला स्वप्ने पडु लागली होती, आता मनी हो बोलणार, मग आपण सुधारणार, नाका वैगेरे सगळे सोडणार, शिकणार काम करणार. अशा आपल्या आयुष्याच्या कल्पना त्याने रंगवल्या होत्या.

इथे "वैलेंटाइन डे" जवळ येत होता. ग्रीटींग्ज, भेटवस्तूंनी दुकाने सजली होती. मन्याला वाटले आपणही भेटकार्ड आणि छानशी वस्तू मनीला देऊ. वेलेंटाईन डे आला. मन्याने भेटकार्ड आणि वस्तूसाठी आईकडून पैसे घेतले होते. इथे मनी कॊलेजात जायला निघालेली असते. मन्या कडक इस्त्री केलेले शर्ट-पैंट घालून परफ्युम मारून मनीच्या समोर येतो. "थांब मनी", ती थांबते. इथे मन्या मनातल्या मनात घाबरलेला .
"बोल, काय काम आहे रे ?" मनी म्हणते. मन्या थरथरल्या हातांनी तिला भेटकार्ड भेटवस्तू देतो. आणि म्हणतो,"मला तु खुप आवडतेस , माझे तुझ्यावर प्रेम आहे." इथे मनी भडकते,"तुझी हिंम्मतच कशी झाली, मला विचारायची." असे म्हणुन मन्याच्या श्रीमुखात भडकावते. "चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन." असे म्हणुन ती निघून जाते. इथे मन्या रडकुंडीला आलेला असतो. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो. तो जाम भडकतो. त्याचे मित्र त्याचं सांत्वन करत असतात.

याच सुमारास काही ठिकाणी वैलेंटाइन डे ला विरोध होत असल्याची बातमी मन्याच्या कानावर येते . अचानक मन्या पलटतो. ही आपली परंपरा नाही. पाश्चात्य आहे असे तो म्हणू लागतो. नाक्यावरच्या मुलांना घेऊन उठतो. विरोध झालाच पाहीजे, वैलेंटाइन डे हाणुन पाडलाच पाहिजे अशा घोषणा तो देऊ लागतो. ज्या दुकानातून त्याने मनीसाठी भेटवस्तू घेतली असते त्याच दुकानात जाऊन तोडफोड करतो. इथे टीव्हीवर मन्या झळकू लागतो. वैलेंटाइन डे ला विरोध केल्याने त्याला प्रसिध्दी मिळते. ज्या पार्टीने विरोध केला त्याचे वरिष्ट नेतृत्व मन्याची दखल घेते. आपल्या पक्षाची लाज राखल्याबद्द्ल त्याला आगामी पालिका निवड्णूकीत नगरसेवक पदाचे तिकीट देते .मन्या निवडून आलेला असतो. तो यापुढे दरवर्षी वैलेंटाइन डे ला विरोध करणार असतो. आता मनीला मन्याच्या कानफडात मारल्याच्या पश्चाताप होत असतो. पण त्या बिच्चारीला काय महित असते की, आपल्यामुळेच मन्या नावारुपाला आला (इथे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे तंतोतंत लागू पडलेले आहे) मन्याला आमदारकीचे तिकीट मिळणार असते. गल्लीतल्या मन्या आता साहेब झालेला असतो...............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा