आमोद पाटील-आगरी बाणा: सप्टेंबर 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

आगरी भाषेतील कथा(Agri Bhasha-Agri Boli-Agri Sahitya)


मारती तुकाराम भोईर-आद्यात्मिक गुरु

वय २७, रंग काला ,कडक हड्डी, बेरकी,

गूनईशेश : पक्का बेवडा

स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार

माजा चुलतभाउ. अंगात रगत कमी दारु जास्त. आज्याचीच देन आनी म्हुन आज्याचा लारका.
आज्यान ल्हानपनापासन बरोबर न्हेल्ता. आज्या टाईट झाल्याव उरलेली हा संपवाचा.
पन पक्का हजरजबाबी.यकदा क बोलाय लागला क आयकाचा न्हाई. कूनालाबी आरवा करनार.

यकदा सरपंचान त्याला समझवला व्हता "बाबा नूस्ता दारू पीवुन घरान परून रहातस जरा घरभायेर पड
मंग समझल दुनया क हाय ती" तर हा म्हन्ला
"सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला"

तर असा हा मारत्या

रोज दारु पीउन येनार न घरात तरास देनार. घरची सगली कंटालली बोल
ह्येचा क कराचा. ह्याची दारु कशी सोरवाची ? सगला लफराच झाला व्हता

येवड्यान खबर मिल्ली क बाजूचे गावान येका सादुबुवान आश्रम खोललाय (कंपनी खोलतान तसा?)
आनी सगल्यांची दारू बी सोरवतो त्यो. मंग काय सगल्यांनी ठरवला क मारत्याला सादुबुवाकड न्हेवाचा. माजे बा न जीम्मेदारी झेतली
न येके दीशी दोगव सादुबुवाकड नींगाले. रस्त्यावरच गूत्ता. मारत्या म्हनाला " काकूस उद्यापासन माजी दारू सूटनार. आज शेवटची पीवन झेवदे." रडाय लागला. तसा बा पातल झाला
"जा पोरा जा आज काय ता करुन झे."

मारत्या सूसाट गुत्त्यावर.धा मिन्टात टाईट.
दोगव आश्रमात पोचले.

मारत्या हालेडूले.

आरती झाली. समोर आरतीच ताट आल. मारत्यान ताटावरशी हात फिरवला तरी आरती वाला उबाच.
"क हाय र बाल्या ? " मारत्यान ईचारला

"दोन रूपए टाका आरतीत." मारत्यान बा कड बगीतल. बा म्हन्ला "अरे टाकाव लागतान. नेमच हाय तसा"
मारत्या भिरभिरला. पाकीटातून शंबराची नोट काडली घडी करून चीमटीत धरली आनी जूगारात शो द्याला उडीवतान तशी ताटान ऊडवली
"पूरे म्हैन्याचे झे. नंतर मागाचे नाय क बोल्तो ?"

आरतीवाला चीप मागारी गेला

सादुबुवाकड नंबर आला
"म्हाराज ह्याची दारू सोरवा. उपकार व्हतील" बा

"बाला जवल ये"
मारत्या सादुबुवाजवल गेला न तेला जांबई आली . सगला वास म्हाराजांचे तोंडाव

म्हाराज धा मिन्ट समाधीत

म्हाराज समाधीतून भायेर आले न काशाला म्हन्ले "हयाला पंदरा दीवस आश्रमात ठीवा. ह्याची दारु सोडाला जरा येल लागल"
मी पंदरा दीवसांनी येतो म्हाराज" बा घरी नीगुन आला

दुसरे दिवशी सकाली म्हाराजांनी मारत्याला बोलवला.
"बस. अरे दारू वाईट आस्ती. दारुनी लोकाचा आयुक्श बरबाद होत. तू आद्यात्मात रस घे, ध्यान कर, त्यानी तुज आयुश्य उजळुन निघेल."

"म्हाराज मना सांगा ध्यान करने चांगल कशावरून ?" मारत्या
"बाला मी ध्यानाचा अनूभव घेतलाय. स्व अनुभवानी सांगतोय." म्हाराज

"मंग दारूचा अनूभव न झेता कस सांगताव दारू वाईट म्हुन ? ध्यानात न दारूत कायव फरक नाय." मारत्या

"अरे ध्यान करून तू देवाशी संवाद साधतोस."
"दारुन पन. डायरेक कोन्ट्याक"

"ध्यानाने संसारात विरक्ती येते"
"दारुन पन. कायव ग्वाड लागत नाय"

"ध्यानाने लोभ, मत्सर ई. विकार दूर होतात"
"दारुन पन. मना दारू मिल्ली क मंग काय बी नको अस्त."

"ध्यानाने माणूस सत्याकडे जातो"
"दारुन पन. येकदा क दारू पोटान गेली क कोनीबी खोट बोलूच शकत नाय. पन मी क म्हन्तो तूमी आदी दारू पीवून बगा मंग सांगा. मी सोरतो."

"आस म्हनतोस ? ठीक आहे. तू घेऊन ये. मी अनूभव घेतो न मग सांगतो."
मारत्यान खीशातन चपटी कारली.
"मना म्हाईत व्हत, झेउनच आलुय."
म्हाराजांनी येक घोट झेतला न जोरात ठसका लागला.
हलू हलू. चन घ्या
म्हाराजांनी चने खाल्ले. "हूश.. बर वाटल" म्हाराज
आवो चन आस नाय खाच , यक चना तोंडान टाकाचा न साल पायाजवल थुकाचा.
प्रोसीजर शीकता शीकता म्हाराजांनी चपटी संपवली.
"आगदी सरगात गेल्यावानी वाटतय रे. उद्या पन अनूभव घेईन म्हणतो."

...
...
...

पंदरा दीवसांनी बा आश्रमात शीरला. नीस्ता दारूचा भपकारा. डावे सायटीला भक्त मंडली भट्टी लावन्यात जूडली व्हती न आतले खोलीन मारत्या आनी म्हाराज गल्यात गला घालून
डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

आगरी नेत्यांचा खोटेपणा...................!!!!!

२३ मार्च, २०११ रोजी करल फाटा येथे प्रकल्पग्रस्तांच्या विराट आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आगरी शेतकरी या लढ्यात सहभागी झाले होते. नवी मुंबई परिसरातील अनेक गावांमध्ये आणीबाणीची परिस्थिती होती. जर त्या दिवशी हा लढा झाला असता. तर संपूर्ण उरण, नवी मुंबई, पनवेल परिसर पेटला असता. इतका जनसमुदाय त्यावेळी जमला होता. पोलिसांनी देखील नवी मुंबई पोलीस मुख्यालयात किती पोलीस फाटा तयार ठेवला होता..........याचे प्रत्यक्ष फोटोच मला मिळाले होते..........त्यांनी पण लय डेंजरस तयारी करून ठेवली होती..............जरी हे आंदोलन शांततेने झालं असत तरी काहीतरी मोठा प्रकार झालाच असता..........इतकी जबर तयारी पोलिसांनी करून ठेवली होती..............मावळ येथे झालेला प्रकार करल येथे झाला असता...........

पण आदल्या रात्री माशी शिंकली...................स्वतःला आगरी समाजाचे तथाकथित पुढारी समजणारे इवले-बावळे लोक, तथाकथित कामगार नेते, तथाकथित भावी आमदार, व्यवस्थापक मंडळावर असणारे अश्या अनेक पदव्या मिरवणारे लोक ज्यांचे जे.एन.पी.टी. आणि सिडको प्रशासनाशी अगदी जवळचे आर्थिक संबंध आहेत. पण तमाम आगरी जनतेला ओरडून सांगणार की आम्ही तुमचे नेते आहोत. पैशे फेकून निवडून येणारे हे लोक यांना काय पडलंय सामान्य जनतेशी?????? स्वतःच्या कंपनीला नवीन विमानतळाचे टेंडर मिळावे म्हणून हे सर्व बोके सिडकोच्या दारात लायनीत उभे आहेत. ही माहिती आपल्याला नसते, पण घाटावरून आलेल्या बिल्डरांना मात्र बरोबर असते. कारण या बोक्याना ते जवळचे वाटतात. अश्या काही बिल्डर लायनीतल्या मंडळींकडून ही माहिती मिळाली.

तर हे असे बोके दिल्ली वरून लेखी आश्वासनाचे ढोंग घेऊन आले. आणि आम्हांला वाटले आमचा विजय झाला. आणि आम्ही लागलो आनंदाने उड्या मारायला. पण हे स्वप्न देखील हवेत विरले. पुन्हा एकदा गद्दारी. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत अशी एकदा नव्हे-तर दोनदा गद्दारी झाली. आणि गेली २५-३० वर्षे कितीदा झाली याचा काही हिशोब नाही. मा.श्री.सुनील तटकरे यांनी दोनदा लय दमदार भाषण दिले आहे याचं वर्षात...........पहिल्यांदा १६ जानेवारीच्या कार्यक्रमात जासई येथे आणि दुसऱ्यांदा २३ मार्च च्या आंदोलनाच्या वेळी करल फाटा येथे............दोन्ही ठिकाणी मी हे भाषण ऐकायला उपस्थित होतो...............त्यामुळे कोण काय-काय बोललं त्यावेळी हे पुरेपुरे माहिती आहे....................काय तर म्हणे................दीड महिन्याच्या आत सर्वाना १२.५% (साडेबारा टक्के) भूखंड वाटप केले जाईल...............अहो पुढारी..............दीड महिने तर केव्हाच संपले................८ महिने झाले या गोष्टीला...............कुठे गेले तुमचे दिल्ली वरून आणलेले लेखी आश्वासन..............आणि कुठे गेली स्टेजवरच्या तथाकथित आगरी ????? श्रीमंत बोक्यानी केलेली भाषणे.................शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ४० वर्षे झाली...............शेतकरी गरीब राहिला...............पण त्यांनी दिलेल्या मतांवर तुम्ही पुढारी झालात.............आणि बीएमडब्ल्यू काय, मर्सिडीज काय.................बंगले काय...............निवडणुकांमध्ये फेकेलेले कोट्यावधी रुपये काय...............कुठून आलं हे सर्व?????????? स्वतःचे कष्ट की...............दलाली??????? तुमच्या सर्वांची निवडणूक अर्जात भरलेली सर्व माहिती आहे आमच्या जवळ.............किती खोटे बोलाल???????? निवडणूक अर्जात पण गोलमाल.............???????? आणि तरीही तुम्ही लोक आमचे जनप्रतिनिधी???????

पाटील साहेब तुम्हांला एक सामान्य आगरी तरुण जो इंटरनेटवरील आगरी तरुणांचा एक छोटासा आवाज आहे......................या नात्याने फक्त एकच सांगणे असेल की, ही नेते मंडळी तुमच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे उद्योग तर करत नाही ना???????? याची जरा खात्री करून घ्या. याचं लोकांनी अनेकदा आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. तुमचं मन मोठ आहे.........तुम्ही ही गोष्ट विसरून त्यांना माफी केली असेल..........पण आमचं काय???????????? कारण या लोकांच्यामुळे आपली गावे तुटली गेली कायमची...........आजही निवडणुका असल्या की, भांडण होतील की काय याची भीती असते. आपलीच माणसे आपल्याचं माणसांशी भांडत आहेत................डोकी फोडत आहेत...............का तर..............यांचा नेता मोठा.............की त्यांचा नेता मोठा...............???????? निवडणुका झाल्या की रात्री रसद येते...............सगले टाईट...............मग ना त्यांना नाती-गोती यांच भान राहत.................अजून किती दिवस...................या असल्या चोर बोक्यांसाठी आपल्या लोकांची डोकी फुटणार आहेत?????????? किती दिवस आपला समाज बदनाम होत राहणार आहे...................?????? काही मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी किती दिवस आपला समाज भरडत राहणार आहे.............???????? यांच्या सात पिढ्यांच्या भल्यासाठी आपला समाज का वाया जातोय?????? मला माहिती आहे की हे प्रश्न तुम्ही वाचणार नाही आणि मी स्वतः देखील तुम्हांला प्रत्यक्ष भेटीत असले प्रश्न विचारणार नाही...............तरीदेखील.................ही अशी गद्दारी पाहून हल्ली राग येत नाही.................सवय झालीय.............पण काहीतरी होतंय...............कुठेतरी खदखदतंय..................कारण अश्या लोकांना आपला समाज निवडून देतो..............पैसे घेऊन म्हणा अथवा इतर काही गोष्टी असतील त्यामागे.................अजून किती वर्ष सहन करायची ही गद्दारी?????????

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

चिरनेर गावातील महागणपती उरण ( Chirner Mahaganpati, Uran)

 आजूबाजूला डोंगर, तळी, खाडी ने आच्छादलेल हे छोटस खेडं.

 देवाचे तळे

मंदीराचा कळस गोलाकार घुमटावर बसविला आहे.

दरवाज्यावर गणेशपट्टी दिसुन येते

मंदीरातील मूर्ती ७ फुट व रुंदी ३.५ फुट आहे. मुर्ती भव्य व शेंदूरचर्चित आहे.

आतील घुमट

मुषक

चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती

उरण-चिरनेरच्या महागणपतीच्या देवळा समोर हया शहिद स्वातंत्र्य वीरांचे हुतात्मा स्मारक बांधले आहे.

उरण-चिरनेरच्या महागणपतीच्या देवळा समोर हया शहिद स्वातंत्र्य वीरांचे हुतात्मा स्मारक बांधले आहे.

उरण-चिरनेरच्या महागणपतीच्या देवळा समोर हया शहिद स्वातंत्र्य वीरांचे हुतात्मा स्मारक बांधले आहे.

ह्या लोखंडी गजाची खुण अजुनही देवळाच्या गजाला जिवंत आहे.

चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती 
 
चिरनेर येथे जाण्याचा मार्ग

HOW TO GO THEIR:
Via Belapur
Belapur-Vahal-Gavhan Phata-Jasai-Jasai Dastan Phata-Chirle-Veshvi-Dighode-Vindhane-Chirner


रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक आगरी समाजाची वस्ती असलेले गाव पनवेल पासून २२ किलोमीटर तर उरण शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य गाव. आजूबाजूला डोंगर, तळी, खाडी ने आच्छादलेल हे छोटस खेडं.

ह्याच गावात एक जागृत, ऐतीहासीक महागणपतीचं देवस्थान आहे. देवळाच्या दिशेला जाताना गावात गल्ली गल्लीतून आत शिरताना कुंभारकामाचे नमुने पहायला मिळतात.

उरण-चिरनेर गावचे हे मंदीर ऐतिहासिक नोंदीतले आहे. ह्या देवळाने इतिहास जोपासला आहे. यादव राजवटीच्या काळात महाराष्ट्रावर परकीयांचे आक्रमण झाले. यादवांचे राज्य अल्लाउद्दिनने १२९४ मध्ये उडविले. सुलतानशाही आणि पोर्तुगिजांच्या आक्रमणाने गणपतीच्या मुर्ती तळ्यात, विहिरीत आणि जमिनीत लपविण्यात आल्या. अशाच मार्गाने चिरनेरचा गणपतीही तळ्यात लपविण्यात आला अशी नोंद आहे.

चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची स्थापना नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दित झाली. त्यांचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे पेशव्यांप्रमाणेच गणेशभक्त होते. धर्मासाठी छळ करणार्‍या पोर्तुगीजांचा पुढे पेशव्यांनी पराभव केला. नानासाहेब पेशव्यांनी उरण व पाली ही आंग्र्यांची ठिकाणे घेतली. सुभेदार व पेशवे सुभेदार रामजी फडके यांना चिरनेर गावच्या तळ्यातील गणपतीने दृष्टांत दिला की, "मी तळ्यात उपडा पडलो आहे. वर काढून माझी प्रतिष्ठापना करा." मग तळ्यामध्ये मुर्तीची शोधाशोध सुरू झाली व गणेशमुर्ती तळ्यात सापडली. ह्या तळ्याला देवाचे तळे नाव पडले.

सुभेदार रामाजी फडके यांनी तळ्यातून काढलेल्या गणपतीचीच्या मुर्तीची हेमाडपंथीय धाटणीच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्या गणपतीला महागणपती संबोधण्यात येते. आता मंदीरावर बाहेरून प्लास्टरचे काम केले आहे.

उरण-चिरनेर येथिल महागणपतीच्या देवळाचा आकार १७ x १७ इतका आहे. आतील गाभारा १२ x १२ फुट आहे. गाभार्‍याचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाज्यावर गणेशपट्टी दिसुन येते. देवळाचा घुमट गोलाकार असून मुख्य घुमटाच्या चार बाजूला चबुतरे आहेत. मंदीराचा कळस गोलाकार घुमटावर बसविला आहे. मंदीरातील मूर्ती ७ फुट व रुंदी ३.५ फुट आहे. मुर्ती भव्य व शेंदूरचर्चित आहे. गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे.

चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती तिळातिळाने वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ह्याची ख्याती पुर्ण उरण-पनवेल परिसरात आहे. त्यामुळे आता इथे भक्तगणांची संख्या वाढली आहे. पुर्वी चिरनेर गावातील लोक न्यायनिवाडा करण्यासाठी गणपतीला कौल लावायचे. माघी गणेशोत्सव व संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तीला सजवण्यात येते. तिला चांदीचा मुकुट चढविण्यात येतो.

उरण-चिरनेरच्या ह्या महागणपतीने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेउन त्याचे चटकेही सोसले आहेत. त्यामुळे चिरनेरच्या महागणपतीच्या मंदीराची गणना भारताच्या ऐतिहासिक मंदीरामध्ये होते.

इंग्रज राजवटीत चिरनेर गावात मोठे जंगल होते अजूनही आहे. त्या काळी चिरनेर गावातील बर्‍याचशा लोकांचा व्यवसाय, त्यांच्या पोटापाण्याची सोय ही जंगलावर अवलंबून होती. जंगलातील मध, सुकी लाकडे, फळे, रानभाज्या, शिकार विकून स्थानिक आपला गुजारा करत असत. पण इंग्रजांनी देशात जंगलावर स्थानिकांना बंदी घातली. त्यामुळे येथिल स्थानिकांचे पोटापाण्याचे हाल होऊ लागले. देशभरातील जंगलावर अवलंबून असणार्‍या सर्व कुटुंबांवर हिच परिस्थिती ओढावली होती. त्या अनुषंघाने १९३० साली देशभार जंगल सत्याग्रह पुकारला गेला. ह्या जंगलसत्याग्रहाला उरण-चिरनेरच्या स्थानिक आगरी जनतेने भरगोस पाठिंबा दिला.

अहिंसेच्या मार्गाने जाणार्‍या ह्या सत्याग्रहाचे रुप हिंसेत बदलले. दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांच्या हुकुमावरुन स्थानीक पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात काही स्थानिक शहीद झाले. मग ह्या गोळीबारातील तपासणी दरम्यान चिरनेर गावचे काही रहिवासी आरोपी म्हणून पकडले गेले. गावात पोलीस चौकी नव्हती म्हणून चिरनेरच्या महागणपतीच्या देवळात ह्या आरोपींना कोंडण्यात आले व देवळाच्या दगडी खांबांना त्यांना करकचून बांधून त्यांना मारहाण केली. पण गणपतीचा आशिर्वाद पाठीशी असल्याने कोणीही देशभक्त माफीचा साक्षिदार झाला नाही. या सामान्य आगरी माणसांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडविला गणपतीच्या आशिर्वादाने. उरण-चिरनेरच्या महागणपतीच्या देवळा समोर हया शहिद स्वातंत्र्य वीरांचे हुतात्मा स्मारक बांधले आहे.

अक्कादेवीच्या जंगलातील गोळीबार थांबल्यावर गावात भितीचे वातावरण झाले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे आपले सहकारी, आप्त स्वर्गवासी झाले ह्याची तळमळ चिरनेर गावच्या बाळाराम रामजी ठाकुर ह्या तरुणाच्या रक्तात भिनत होती. पोलिसांवर सुड उगवण्यासाठी, त्यांची निर्भत्सना करत तो निधड्या छातीने देवळाजवळ आला. तेंव्हा पोलिस खात्यातील एका पोलिसाने बाळाराम ठाकुरच्या दिशेने नेम धरला. बाळाराम सभामंडपाच्या दरवाज्याजवळ उभा होता. पण पोलिसाचा नेम चुकला व गोळी सभामंडपाच्या गजाला लागली. बाळाराम ठाकुर ह्यांचा हात जखमी झाला. नंतर त्याच्यावर उपचार झाले. ह्या लोखंडी गजाची खुण अजुनही देवळाच्या गजाला जिवंत आहे. ग्रामस्थ ही निशाणी त्या गजाला वेगळा रंग देऊन शाबुत ठेवतात.

तर असा हा उरण-चिरनेर गावचा गणपती नवसाला पावणारा गणपती, तिळातिळाने वाढणारा म्हणून ह्याची ख्याती उरण, मुंबई, पुणे, पनवेल येथे पसरलेली आहे. आपणही चिरनेरच्या महागणपतीचे जरूर दर्शन घ्यावे. एक उरण तालुक्यातील रहिवासी तसेच महागणपती भक्त या नात्याने आपणाला आग्रहाचे निमंत्रण.

सौजन्य:
सौ.प्राजक्ता म्हात्रे(उरण)

शनिवार, १० सप्टेंबर, २०११

ओणम सण /Onam Festival Celebration at Panvel Railway Station

ओणम  रांगोळी पनवेल रेल्वे स्टेशन(०९/०९/२०११)

ओणम  रांगोळी पनवेल रेल्वे स्टेशन

ओणम  रांगोळी पनवेल रेल्वे स्टेशन

ओणम  रांगोळी पनवेल रेल्वे स्टेशन

ओनपोट्टन

इसे पुलीकलि कहते हैं (शेर नाचा)


ओणम – केरल का सबसे महत्वपूर्ण पर्व

कल पनवेल रेल्वे स्टेशन पर ओणम के अवसर पर फुलो से बनायी हुई रंगोली बनायी थी(पनवेल रेल्वे स्टेशन-09/09/2011). यही है हमारे भारत की पेहचान विविधता मे एकता. पुरानी यादे हो गयी ताजा............ अब मै जिस कालेज मे ११/१२ वी मे था, वहा "ओणम" मनाया जाता था. वैसे उस दिन हमे छुट्टी होती थी. पर अगले दिन कालेज मे फुलो से रंगोली बनाते थे. अभी उसी ओणम के बारे मे कुछ बाते मेरे केरळी दोस्तोने बताई हुई, कुछ यहा वहा पढी हुई, देखी हुई. यह ब्लॉग हिंदी मे लिखने का यही प्रयोजन है की, लिखा हुया मेरे दुसरे दोस्त भी पढ सके जो मराठी अच्छे तरह से नही पढ पाते है. जहा जहा खाने की बात होती है, वो सभी त्यौहार मुझे बहुत पसंद है. जैसे गणपती मे मोदक, ईद के दिन शीर कुर्मा, ओणम के दिन पायसम, रस्सम..............यही तो है हमारे भारत की अलग पेहचान.........हर त्यौहार अपने आप मे बहुत अलग है............लेकिन एक चीज सभी मे समान है............वो है अपनापन..............जो दुसरे देशो की संस्कृतियो मे कभी दिखाई नही देता.

अभी अभी केरल के मलायालिओं ने “ओणम” मनाया है. वास्तव में यह भी फसल के काटने के बाद अगस्त/सितम्बर में मनाया जाने वाला दस दिनों का लम्बा त्यौहार है. इस समय प्रकृति भी बड़ी कमसिन होती है. फूलों की, केरल  के विभिन्न प्रकार के केलों की और पके कटहल आदि की भरमार भी होती है. ओणम की तैय्यारियाँ तो काफी पहले ही शुरू हो जाती है परन्तु उत्सव का  प्रारंभ “हस्त” नक्षत्र से होता है और वास्तविक ओणम दस दिन बाद श्रवण नक्षत्र के दिन रहता है. शासन के द्वारा भी इसे एक राष्ट्रीय पर्व के रूप में मान्यता मिली हुई है.

मिथकों के अनुसार असुरों का एक राजा था जिसे महाबली के नाम से जानते हैं. मावेली भी कहा जाता है. कुछ लोगों में यह भ्रम है कि यह रामायण काल का बाली है. नहीं, यह महाबली  (वास्तविक नाम इन्द्रसेन) प्रहलाद का पोता था और विरोचन का बेटा. अपने पितामह की तरह महाबली भी परम विष्णु भक्त था. अश्वमेघ याग आदि के जरिये उसने अपना एक साम्राज्य स्थापित कर लिया था जहाँ  जनता में पूरी समानता थी. कोई जाति या धर्म भेद नहीं था. सभी संपन्न एवं सुखी थे. इसे केरल का स्वर्ण युग कहा जा सकता है. आज के अमरीका की तरह लोग जानते ही नहीं थे कि गरीबी क्या चीज है. समस्या यह थी कि महाबली एक असुर था (किन की नज़रों में?) और देवलोक के राजा इंद्र महाबली के उपलब्धियों से विचलित हो गए. उन्हें उनका सिंहासन डोलता नज़र आया. वे अपने आपको असुरक्षित महसूस करने लगे (वास्तव में यह ईर्षा थी) और दौड़े दौड़े विष्णु जी के पास गए और नमक मिर्ची लगाकर अपना दुखड़ा सुनाया.  दूसरी तरफ इन्द्र की माता अदिति ने भी  “पयोव्रत” द्वारा भगवान् विष्णु का आह्वान किया. यह सर्वज्ञात था कि महाबली परम दानवीर है. भगवान् विष्णु ने इंद्र पर छाए हुए संभावित संकट को दूर करने के लिए एक कार्य योजना बनायीं. उन्होंने अदिति के ही गर्भ से वामन रूप में जन्म लिया.

इस  वामन अवतार का प्रयोजन मात्र इंद्र की गद्दी को सुरक्षित रखना था, सो एक बटुक के रूप में विष्णु जी नें महाबली के यहाँ दस्तक दी. (परशुराम के निर्देशानुसार कोई भी क्षत्रिय किसी ब्रह्मण को भिक्षा देने से इनकार  नहीं कर सकता इसलिए यह रूप धारण करना सार्थक रहा). राजा महाबली उस समय अपने इष्ट की पूजा में तल्लीन था. जब आँखें खोलीं तो सामने एक बटुक खड़ा था. राजा ने पूछा बोलो बालक क्या चाहिए. बटुक (वामन रूप में विष्णु) ने कहा मुझे केवल तीन पग भूमि चाहिए. राजा महाबली को हंसी आई और कहा इसमें क्या बात है ले लो. वास्तविकता यह है कि महाबली को भी आभास हो चला था कि स्वयं उसके इष्ट देव उसे मोक्ष  देने आ गए हैं. विष्णु जी ने अपना विराट रूप (त्रिविक्रम) धारण कर लिया. एक ही पग में पूरी धरती समां गयी. दूसरे में आकाश अब तीसरे पग को रखने के लिए कोई जगह शेष नहीं बची. महाबली ने नतमस्तक होते हुए अपना सर बढ़ा दिया ताकि प्रभु के चरण उसपर पड़ें. हुआ भी वैसा ही. प्रभु के चरण महाबली के शीश पर और इसके साथ ही  वह पाताल लोक में पहुँच गया. विष्णु जी ने महाबली को वरदान दिया कि वह प्रति वर्ष एक दिन के लिए अपने प्रिय प्रजा से मिलने पृथ्वी लोक में आ सकेगा.

ओणम का उत्सव  उसी महाबली के स्वागत में प्रति वर्ष आयोजित की जाती है जो दस दिनों तक चलती है. उत्सव त्रिक्काकरा (कोच्ची के पास)  केरल के एक मात्र वामन मंदिर से प्रारंभ होती है. ऐसी मान्यता है कि महाबलि की राजधानी त्रिक्काकरा में ही थी. प्रत्येक  घर के आँगन में फूलों की पंखुड़ियों से सुन्दर सुन्दर रंगोलिया (पूकलम) डाली जाती हैं. युवतियां  उन रंगोलियों के चारों तरफ वृत्त बनाकर उल्लास पूर्वक नृत्य (तिरुवाथिरा कलि) करती हैं. इस पूकलम का प्रारंभिक स्वरुप पहले (अथम के दिन) तो छोटा होता है परन्तु हर रोज इसमें एक और वृत्त फूलों का बढ़ा दिया जाता है. इस तरह बढ़ते बढ़ते दसवें दिन (तिरुवोनम)  यह पूकलम वृहत आकार धारण कर लेता है. इस पूकलम के बीच त्रिक्काकरप्पन (वामन अवतार में विष्णु), महाबली तथा उसके अंग  रक्षकों की प्रतिष्ठा  होती है जो कच्ची मिटटी से बनायीं जाती है और इसे कोई रूप न देकर केवल एक पिरामिड जैसा बनाया जाता है. ऊपर की तरफ त्रिकोण न होकर सपाट होता है. इसके लिए भी कुछ नियम हैं. ऐसे मूर्तियों की संख्या अलग अलग दिनों में अलग अलग होती है.  वामन को कुछ नाटा एवं मोटा सा बनाया जाता है. इनका प्रयोग केवल एक दिन ही किया जाता है. प्रति दिन अलग से मिटटी से ऐसे विग्रह बनाये जाते हैं और उनकी विधिवत पूजा होती है. यह परंपरा अब लुप्त प्रायः है. केवल कुछ एक घरानों में निभाई जाती है. प्रति दिन भोज (सद्य) का आयोजन रहता है जिसके लिए भांति भांति के व्यंजन बनाये जाते हैं.

शहरों  और ग्राम्यांचलों  में मनोरंजन तथा प्रतिस्पर्धा के कई कार्यक्रम आयोजित किये जाते हैं. नौका दौड़ का आयोजन भी कुछ जगहों पर होता है. मध्य प्रदेश में पान्ढुर्णा के पास दो समूहों के बीच पत्थरबाजी के बारे में (गोटमार) आपने सुना होगा, उसी की तर्ज पर ग्राम्यांचलों में एक दूसरे पर हाथ चलाने की प्रथा भी रही है जो आजकल कुछ ग्रामों जैसे पल्लसेना (पालक्काड)  आदि में बची हुई है.  इसे “ओणम तल्लल” के नाम से जाना जाता है. क्रिसमस में जैसे सांता क्लाउस  का आगमन होता है उसी तरह महाबलि भी  प्रत्येक घर दुःख सुख की खबर लेने और अपना आशीर्वाद देने अपने विचित्र वेश (“ओनपोट्टन”) में आते हैं. यह परंपरा अब केवल कुछ ग्राम्यांचलों तक सीमित हो गयी है. नगरों में चल समारोह का आयोजन  होता जिसमे आकर्षक  झांकियां होती हैं और चहुँ ओर उल्लास का वातावरण होता है.

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

दिबांच्या विविध भावमुद्रा.(Di.Ba.Patil Saheb, Agri Samaj)

दिबांची  एक प्रसन्न भावमुद्रा.


 १९/०६/१९८१ जासई येथील छायाचित्र. प्रकल्पग्रस्त जनतेला मार्गदर्शन करताना मा.लोकनेते.श्री.दि.बा.पाटील साहेब.


आगरी  समाज परिषद १९८८ साली


पाटील साहेबांचा लोकसभा  विजय १९८४


नवीन  पनवेल(पूर्व) येथे आगरी जनतेला मार्गदर्शन करताना ३ जानेवारी, १९८५


पनवेल  नगराध्यक्षपदी निवड १९७४


भाषण  करताना प्रसन्न भावमुद्रा


घरी वाचनात मग्न
१९७७ साली लोकनेते.मा.श्री.दि.बा.पाटील साहेबांची पेण येथील पहिली खासदारकी प्रचार सभा प्रमुख वक्ते जगन्नाथ कोठेकर.


मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटीलसाहेब आणि त्यांचा अर्धांगिनी कै.सौ.उर्मिला दिनकर पाटील

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.