आमोद पाटील-आगरी बाणा: जानेवारी 2016

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १७ जानेवारी, २०१६

आगरी कथा-मनाव पायजे




आगरी कथा-मनाव पायजे

     त इस-पंचइस वरसा आगोदरची बात आसल...लय लोकांना याचे बाबत बोलताना आइकलेला हाय...

     यके मोटरसायकलवाल्याला डंपरनी उरवला न जनचे तया तो मेला. थंडीच दिस चालू व्हतं न एक्षिडेन्ट रातचे टायमाला झाला. पोलिसाई ती डेत बॉरी रस्त्याचे बाजूचे शेतान आणून ठेवली न डेत बॉरीचे आंगाव चादरी टाकली. शेताचे आजूबाजूला रास झारा न शेतपुन तसा उतारावरूच व्हता. आजून सगल्या सरकारी गोष्टी  कराच्या बाकी व्हत्या, त्याचेमुल प्रेत आजून पोस्टमाटम कराला पाठवला नवता.

पोलीसचवकी थोरेशेच टायमाव व्हती त्याचेमुल तया एक्षिडेन्ट झाल्याव आलेले चार पोलिसाइ इचार केला क आवरे रातचे कोन कनाला शेतान येईल. त्याचेमुल आपुन सगलीजना सोबतुच जेवाला जाऊ. तसापुन प्रेताचे बाजूला बसून जेवान काय घशाचे खाली उतरणार नाय. मंग, सगल पोलीस जेवाला गेल. जेवून झाल्याव चारी पोलीस परत शेतान गेलं. आवरे रातचे रस्त्याव गाऱ्यापुन जास्त नवत्या. त्या जवा यवा-जावाच्या तवाच थोरिशी लाईट येवाची न जावाची. नयत सगला कालोख, ते दिशी आमावस आसलं. तसले कालोखान एकमेकाची थोबारा पुन दिसत नवती. सगल पोलीस प्रेत ठेवलेला त्याचे बाजूचे खिरकाव बसलं. आवरे थंडीन गरमीचेसाठी यके पोलीसाला इरी वराची हुकी आली. त्याला इरी वरताना बघून दुसरे पोलिसाला पुन हुकी आली तो बोलला मनाव यक पेटव. तवऱ्यान आवाज आला, "मनाव पायजे..."

      चारी पोलिसाई यकमेकाची थोबारा पायली न यकमेकाना ईचाराला लागलं...कोन बोलला...ते सगल्याना यकमेकाची आवाजा वलखत व्हती न ते दोग पोलीस सोरून दुसरं दोग इरी-बिरीचा चंद कवाच करत नसत. मंग सगल्याना प्रश्न परला, यो बीजा आवाज कोनचा...?? तवऱ्यान ते सगल्याई प्रेताचे कर पायला...प्रेताचा यक हात वर हालतय न त्याच्यानशी आवाज यत व्हता..."मनाव पायजे..."

     आता तुमीच इचार करा, आशी कंडिशन आसल त तुमी काय कराल. तुमी सगली जना बोलाल, कनचा काय...पेंट हातान धरू न पयले तनशी पलत सुटू. पोलिसाई पुन त्याच केला. सगला इसरून, भान हारपून पोलीस पलत सुटलं...आखर प्रेताचा भूत झालाय न इऱ्या मांगाला लागलाय...बसला मानगुटीव त रगत-बिगत पिवाचा न आपलाच भूत व्हवाचा...पोलीस जे पलत सुटल ते परत काय त्याइ माग बगला नाय. जनशी रस्ता भेटलं तनशी ते पलाल. ये पलापलीन यके पोलीसवाल्याची तंगरी मोटे खिरकान आराकली, त्याला वाटला भूतानी पकरला. आता सगला खपला न तो पोलीसवाला जनचे तया थंड परला. दुसर तीनजन पलत-पलत पोलीस चवकीन पोचलं. काट्याकुट्यांशी पलून त्यांच कपर फाटल, डोफ फुटलं, सगला आंग सोलकाटला व्हता न जनशी तनशी रगत वात व्हता. तशेच परिस्थितीन पोलीस चवकीची सगली दारा-खिरक्या लावून सगलजन सकाल व्हवाची वाट बघाला लागलं.

     सकाल झाल्याव पोलीस चवकीच मेन सायेब आलं. चवकीच दरवाज, खिरक्या बंद बघून त्याइ दार जोरजोरान वाजवला. आतूनशी सोबतूच आवाज आला,"कोन हाय..." बायेर सायबाचा डोका गरम झाला न बोलला,"साल्यावो, तुमचा बापूस हाय, तुमचे सगल्यांचे मयताव आलोय..."
सायबाचा गरम आवाज आयकुन ते पोलीसाई आतून हालूच दार उगारला. आतची आवस्था पाऊन सायेब आजून गरम झाला. तरीपुन शांत होत त्यानी सगल्याना ईचारला काय झाला. मंग यकेकांनी काल रातचे झालेला सगला प्रकार सांगला. सायबानी ये तिघांना चवथे पोलीसाचे विषयी ईचारला तर ये तिघ बोललं त्याला भुतानी पकरला...

     आता मात्र सायबाचा डोका सनकला, ये तिघाजना चवथे पोलिसाला टाकून पलाले. पुन येल बघून सायबानी निरनय झेतला, आगोदर चवथे पोलिसाचा शोध झेऊ मंग ते ईरीवाले भुताचा. सगलीजना सायबाचे माग-माग काल रातीचा रस्ता दाखवत निंगाली. थोरे लांब जेल्याव चवथा पोलीस आरवा परलेला न त्याच दगराचे फटीन आरकलेले पाय शाप काल-नील झालेल दिसल, दगरावर आपटून त्याचा थोबार चंगलाच फुटला व्हता. मंग, ते तीन पोलीस बोलाला लागल..."सायेब बगा, आमी बोललेलो, याच पाय भुतांनी धरलेलं...त्याचेमूल याच पाय काल-नील झालन..."

     सायबानी त्यांचे कर लक्ष न देता चवथा पोलीस जीता हाय का मेलाय त्या बगला. चवथे पोलिसाची नारी चालू व्हती न हालू हालू नाकानशी हवा आत-बायर व्हतं व्हती. सायबानी ते पोलिसाच पाय अगोदर दगरांचे फटींशी बायेर काराला सांगल, पोलिसाला शुद्दीव आणासाठी त्याचे थोबारावर पानी मारला. थोरासा शुद्दीव आल्यावर त्याच्यानशी दोन पोलिसाना त्याला धरून पोलीस चवकीव नेवाला सांगला न तनशी सायबाची गारी झेवून त्याला यके पोलीसानी दवखान्यान घेऊन जावाचा न दुसऱ्यानी पोस्टमारटम वाल्याना लवकर झेवून येवाचे आदेश दिला.

     तिसरे पोलीसाला झेवून सायेब जया डेत बॉरी ठेवली व्हती ते शेतान पोचले. सायबानी प्रेताचे वरची चादर कारून टाकली. त आतमध्ये प्रेताचे जागी दुसराच माणूस...!!
आता बाजूचे पोलिसाची परत टरकली. पुन, आता सायेब बाजूला हाय म्हून तो गप बसला. सायबानी पाच मिनिटा त्या दुसरे प्रेताचे कर बगला तर इ नवीन डेत बॉरी अंगावरशी चादरी बाजूला केली की परत अंगाव खेचाचा. 2-3 येला ये नवीन भुताचे बरब चादरी ओराचा खेल खेलुन झाला न आता सायबाची ट्यूब पेटाला लागली...

     "उठ भडव्या...",आसा बोलत एक जोराची कानफटान ते चादरी ओरणारे भूताचे थोबारान मारली. सकालचे थंडीचे आवरे जोरान कानफटीन बसून व्हवाचा त्याच झाला...दुसरा पोलीस सायबाला बोलला, "सायेब, यानी आबिशेक केला..." आता तो भूत नसून कोणतरी माणूसूच हाय या त्या दुसरे पोलिसाला समजून आला. तो माणूस तनचे तया बसून रायला, त्याला एके कानफटीन बरोब गर्मी मिलाली व्हती, तरीपुन तोंडाशी दारूचा वास यत व्हता.

     सायबानी आता आजूबाजूच खड्ड बगाला सुरवात केली. सायबाला बाजूचेच यके खड्डयान कालची डेत बॉरी मिलाली. पोलिसाला बोलवून सायबानी त्याला विचारला इच का कालची डेत बॉरी. पोलीस हो बोलला. आता ह्या असा कसा झाला त्याची मायती ते माणसाचे करून झेवाला सुरवात केली. ते माणसाची आता उतरली व्हती, त्यामुळे तो पुन बोलाला लागला व्हता.

     त झाला असा...काल ते माणसाचा पगार झालेला, सांचे दारू पिवाला देशी दारूचे बारमध्ये जेला. तया यानी आवरी पिली की याच हालाडुलाचा शाप वांद झाला...तश्यानुच रातचे टमटम बंद. आता घरा जावाच पुन वांद...मंग, गरी तसाच हालत डुलत निंगला. यके ठिकाणी त्याला यक माणूस झोपलेला दिसला, तो अंगावरशी चादरी झेवून झोपलेला बगून त्यानी इचार केला थोरिशी उतरपरेंत आयाशी आराम करू. म्हणून, मंग त्यांनी ती चादर वरली न चादरीचे आत झोपलेले माणसाला खाली लोटला, तो झोपलेला माणूस पुन लोलत लोलत खाली जेला न परत काय चादरी मांगाला आला नय. तो थोरासा झोपलेला तवऱ्यान चार माणसा येऊन बाजूचे खिरकाव बसली न त्याच्यानशी यकजन इरी वराला लागला. मंग, ते चादरींचे भुताला पुन तलफ सुटली न तो बोलला..."मनाव पायजे...!!"

आपलाच, 
आमोद पाटील.

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

आगरी खाद्यसंस्कृती-मकरसंक्रांती निमित्ताने घरी बनवलेले पोळे



आगरी खाद्यसंस्कृती-मकरसंक्रांतीनिमित्ताने घरी बनवलेले पोळे


साहित्य:-
पाव किलोपेक्षा थोडे जास्त तांदळाचा पीठ, जितकं गोड हवं त्यानुसार गूळ, खिसलेला ओला नारळ, हळद, चिमूटभर खायचा सोडा, चिमूटभर मीठ, पाणी

अंदाजे-7 ते 8 पोळे

कृती:
1.
प्रथम पाणी कोमट करून, त्या पाण्यात गूळ विरघळून घेणे.
2.
मग, त्याच पाण्यात खिसलेला ओला नारळ, हळद, सोडा, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि त्यानंतर या मिश्रणात तांदळाचा पीठ मिक्स करणे.
3.
मिश्रण जास्त जाड नको आणि जास्त पातळही नको.
4.
तयार केलेले मिश्रण एका टोपात काढून घेणे. जर घरी कोळश्याचा तुकडा असेल तर तो लाल होत पर्यंत त्याला उष्णता द्यावी आणि तो कोळसा मिश्रण असलेल्या टोपात ठेवावा आणि त्यावर तेल सोडावे. यामुळे कोळसा धुमतो आणि टोपावर लगेच झाकण ठेवून द्यावे. त्यामुळे धूर टोपात राहील.(कोळसा नसला तरी काही प्रॉब्लेम नाही)
5.
आपली मिश्रण रात्री झोपण्याअगोदर बनवायला घ्यावे आणि पूर्ण रात्रभर हे मिश्रण टोपात व्यवस्थित ठेवून द्यावे. सकाळी उठल्यावर हवे तेव्हा मिश्रणाचे पोळे बनवता येतात.
6.
फ्रायिंग पॅन घेऊन त्याला तेल लावावे. तेल लावण्यासाठी जर कांदा कापून, तो कांदा तेलात बुडवून नंतर फ्रायिंग पॅनवर फिरवता येतो. एक पोळा बनवून झाल्यावर पुन्हा दुसऱ्या पोळ्यासाठी तेल लावावे लागते.
7.
पॅनला तेल लावून झाल्यानंतर मिश्रण एका छोट्या कपात घेऊन पॅनवर गोलाकार रीतीने सोडून द्यावे. पूर्ण आकार दिल्यानंतर पॅनच्या आकाराचे ताट पॅनवर ठेवून द्यावे, वाफेमुळे पोळा शिजण्यास अजून मदत होते.(ताट ठेवला नाही तरी प्रॉब्लेम नाही)
8.
एका बाजूने पोळा व्यवस्थित शिजला की त्याला उलटून दुसरी बाजू व्यवस्थित शिजवून घ्यावी.
9.
अश्या रीतीने जितके पीठ असेल त्याप्रमाणे वरील कृती वापरून पोळे बनवता येतील. प्रत्येक पोळ्याच्या अगोदर पॅनला तेल लावावा, त्यामुळे पोळा पॅनला चिकटणार नाही.
10.
टीप:-गुळाचे प्रमाण जितके जास्त असेल तितके पोळे उलटण्यास त्रासदायक होतात आणि व्यवस्थित उलटत नाही. त्यामुळे गुळाचे प्रमाण योग्य तितकेच ठेवावे
11.
खाण्यास तयार...शुभ मकरसंक्रांती...गोड खा, गोड राहा...

पाककृतीची माहिती तसेच पाककृती बनविणार:-आई

आपलाच,
आमोद पाटील.