आमोद पाटील-आगरी बाणा: नोव्हेंबर 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

देश उबल रहा है..... !! (stupid common man)



देश  उबल रहा है......................

झालेली घटना आवडली नाही.
महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित
व्यक्तींवर राग आहे,
जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे.
पण त्याचा निषेध करण्याचा हा मार्ग नव्हे असे वाटते. एका संपुर्ण
संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्याच्या अपयशाबद्दल एखाद्या व्यक्तीवर
असा हात उचलणे पटले नाही. पवारांना त्यांची चूक दाखवुन द्यायची असेल तर
आता निवडणुका आहेतच, त्यावेळी त्याची चुणुक मतदानातुन दाखवता आली असती.
ह्यातुन 'अराजक' आले आहे की काय असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही
परंतु जे काही घडते आहे ते नक्कीच योग्य नाही.
अवांतर १ : पवारांचे वय पाहता ह्या घटनेचे जास्तच वाईट वाटले.
अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच
वाईट वाटले. 'गोरे इंग्रज
जाऊन काळे इंग्रज आले' असे
म्हणणार्या एका गांधीवाद्याची अशा 'हिंसक' प्रकरणावरची 'एकच मारली का?'
अशी कुत्सित प्रतिक्रिया देखजनक आहे.
'तोबा तोबा' म्हणत हल्ल्याचा निषेध अनेक मर्हाटी नेत्यांनी केलाय.

हल्ले करून प्रश्न सुटत नाहीत.
- मनोहर जोशी.
(मग आपण्/ आपले कार्यकर्ते ईतकी वर्षे अहिंसेची खिल्ली का उडवत होते?)

हा हल्ला निषेधार्हच आहे. महाराष्ट्रात त्यांची संतापजनक प्रतिक्रिया
उमटणे सहाजिक आहे. हल्लेखोराला महागाईविरोधातच राग व्यक्त करायचा होता तर
मनमोहन सिंग यांच्यापासून सुरुवात करायची होती.
- राज ठाकरे.
(kahi divasapurvich ekmekanchi khandane kadhat hote!! Baki 2
varshapurvi asach halla Maharashtra vidhansabhet dekhil zalyach
aathaval!!)

शरद पवारांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो. अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे .
- अनंत गीते.
( १९९२ च्या दंगलीत भाग घेणार्यांनाही शिक्षा झाली पाहिजे ना?)

शरद पवारांवरील हल्ला घृणास्पद आहे'
- बाळासाहेब ठाकरे.
(har ek friend jaruri hota hai!!)

अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया होती ...
(अण्णाजी , शरद पवारको दिल्लीमे किसीने चांटा मारा..)
अण्णा:- एकही मारा क्या?
(आज तक.)
 
नन्तर आपले नेहमीचे गांधीवादाचे दळण त्यानी चालू केले. कारण कालच दारू
पिणार्याना विजेच्या खाम्बाला बांधून बदडले पाहिजे या त्यांच्या वाक्यावर
त्याना सर्वच स्तरातून 'झाडण्यात' आले होते. टीम अण्णाच काय पण खुद्द
अण्णाही बालीश वक्तव्ये कर्ण्यात मागे नाहीत आणि हे म्हणे राष्ट्राला नवे
नेतृत्व देणार....
(Gandhi topi ghalun koni Gandhivadi banat nahi!!!!)
ही नेते मंडळी देशाचे प्रश्न सोडवताना कधी एकत्र येताना दिसतात काय ?
फक्त त्यांची पगारवाढ करुन हवी असेल आणि असे काही अघटित घडले की लगेच हे
लोक एकी दाखवायला पुढे सरसावताना मात्र दिसतात !
आणि दुसरं काही नाही सापडलं म्हणून मग "हे मराठी माणूस सहन करणार नाही"
वगैरे भावनिक भडकाउ विधानं
करायची. मराठी आणि अमराठीवाद कुठुन आला यात?
बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्यांना खांबाला बांधून
झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे पाय दिसलेत.
वेनसडे मधल्या "स्ट्युपिड कॉमनमॅन"चं, "आज मे तरीके के
बारेमे नही नतीजे के बारेमे सोच रहा हुं", "लोगों मे गुस्सा बहोत है,
उन्हे आजमाना बंद किजिये", वगैरे आठवलं.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

फेसबुक आगरी नेटिझन्स फॉर आगरी कट्टा @वाघबीळ ( AGRI KATTA)


फेसबुक आगरी नेटिझन्स फॉर आगरी कट्टा @ वाघबीळ, ठाणे(पश्चिम)
AGRI KATTA
दि. १९ नोव्हेंबर, २०११ रोजी आगरी विकास सामाजिक संस्थेच्या पहिल्या कट्ट्या वर 'आगरी समाज काल, आज आणि उद्या' याविषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्या मध्ये प्रमुख वक्ते प्राध्यापिका कादंबरी कोठेकर, पत्रकार शशिकांत कोठेकर व कवी रामनाथ म्हात्रे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आगरी समाजाचा इतिहास पत्रकार शशिकांत कोठेकर व कवी रामनाथ म्हात्रे यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापिका कादंबरी कोठेकर यांनी आगरी समाजाच्या सद्य परिस्थिती बद्दल आपले परखड मते व्यक्ती केली व उपस्थितांची वाहवा मिळवली. आधुनिकीकरणामुळे रायगड, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आगरी लोकांच्या वस्त्या दिसेनाश्या झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा आगरी समाजामध्ये एक संघपणा नाही आहे अशी खंत उपस्थितांनी मांडली. आगरी समाज सातासमुद्रा पलीकडे गेला असून येणाऱ्या काही दिवसात आजच्या पिढीतले तरुण आपल्या समाजाचा वेगळा आसा इतिहास लिहितील अशी आशा संस्थेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या दिवसात आगरी समाज आणखी उल्लेखनीय कामगिरी करेल आशी आशा उपस्थित पाहुण्यांनी केली. कादंबरी शशिकांत कोठेकर संपादित "आगरी समाजमन" या दिवाळी अंकाच्या प्रती उपस्थितांना मोफत वाटण्यात आल्या.

"आगरी समाजा मध्ये उच्च शिक्षणात आणखी उल्लेखनीय कामगिरी यासाठी तसेच आगरी समाज आजही जुन्या वाईट रूढी व परंपरा काही प्रमाणात पाळतो या मध्ये सुधारणा होण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. " असे मत प्राध्यापिका कादंबरी कोठेकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मुख्य सूत्र संचालन लेखक व आगरी प्रभोधन कट्ट्याचे प्रमुख सल्लागार अनिल ठाकूर यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.

पहिल्या आगरी प्रभोधन कट्ट्या वर नाना पाटील, पांडुरंग पाटील, गणेश चौधरी, तुळशीराम शिंगे, भास्कर डाकी, जयवंत म्हात्रे, किशोर भोईर, संतोष भोईर, प्रकाश शिंगे व लीलाधर मणेरा इ. व्यक्ती उपस्थित होते.


आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

उरणला देखील लोकल प्रवासी रेल्वे जाणार(Nerul-Uran Railway)

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारताना आवश्यक असलेली दळणवळणाची इतर माध्यमे आधी पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सिडको व्यवस्थापनाने निर्धार केला आहे. नवी मुंबईत १९९२ साली रेल्वे सुरू झाली. त्याला आता बघता बघता २० वर्षे होत आली. या कालावधीत नवी मुंबईच्या विकासाला वेगळी गती मिळाली.

नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत उलवे, द्रोणागिरी नोड, उरणचा विकास होणार नाही, त्यासाठी हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. सिडकोने १० वर्षांपूर्वी नेरूळ-उरण दरम्यान २७ किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून त्याच्या कामाला सुरूवात केली होती. त्यावेळी या रेल्वेमार्गासाठी सिडकोने ४९५.९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता. सुरुवातीस सिडकोने या प्रकल्पासाठी २१६ कोटी रुपये खर्च केले होते. या रेल्वे मार्गादरम्यान खारफुटीसह इतर समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाचे काम रखडले गेले. आता पुन्हा सिडकोने या प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. या रेल्वे प्रकल्पासाठी सिडकोची ६७ टक्के (९४६ कोटी रुपये) तर रेल्वेची ३३ टक्के (४६६ कोटी रुपये) भागीदारी असणार आहे. १० वर्षे हा रेल्वे प्रकल्प रखडलेला असल्यामुळे १ हजार कोटी रुपये अधिक खर्च या प्रकल्पावर करावा लागणार आहे. भविष्याचा विचार करता हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.


नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर सीवुड्स-दारावे, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावा-शेवा, जासई, द्रोणागिरी, उरण अशी १० रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. याशिवाय या रेल्वेमार्गावर सीवुड्स, द्रोणागिरी, उरण या भागाचा विकास साधण्यास मदत होणार आहे. त्यातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव सिडकोने रेल्वे प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. रेल्वे प्रशासनाने नेरुळ-उरण रेल्वे मार्ग उभारणीच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पास गती मिळणार असून, हा प्रकल्प येत्या काही वर्षात पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पनवेलहून जेएनपीटीकडे मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वेमार्ग आहे. परंतु, त्यावरुन प्रवासी वाहतूक केली जात नाही.

उरण आणि आजूबाजूच्या परिसरात जे.एन.पी.टी., ओ.एन.जी.सी. तसेच अन्य प्रकल्प कार्यरत आहेत. याशिवाय भविष्यात आणखीन काही प्रकल्प येण्याची शक्यता आहे. उरण परिसरातील नागरिकांना नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, बदलापूर तसेच अन्य ये-जा करणे नेरुळ-उरण रेल्वे मार्गामुळे शक्य होणार आहे. मालगाड्यांच्या वाहतुकीबरोबर प्रवाशांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. वाढती लोकसंख्या, बदलती परिस्थिती या सार्यांचा विचार करताना नेरुळ-उरण रेल्वे मार्ग सर्व दृष्टीने, उपयुक्त ठरणार आहे. उरणपासून नवी मुंबई परिसरापर्यंत रस्ते विकासावर भर देण्यात आलेला आहे. अनेक रस्त्यांचे रुंदीकरण, मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. कॉरिडॉरसारखा प्रकल्पही भविष्यात आकारास येणार आहे.

Nerul/Belapur-Uran Railway corridor

SALIENT FEATURES
  • Length:27 km. approx.
  • Approved Cost By Railway Board:Rs.1412.17 crores ( 2009 price level)
  • Date of start:June / July - 1997
  • Number of stations:10
  • Names:Seawoods,Sagarsangam, Targhar, Bamandongari Kharkopar,Gavan,Jasai, Nhavasheva,Dronagiri & Uran
  • Road over bridges:5 Nos
  • Road under bridges:15 Nos.
  • Track under bridge:1 No
  • Major bridges:Important bridge of 751 m span across  Panvel creek completed, 4 major  bridges, one viaduct.
  • Number of rakes:11 Nos.
  • Platforms:270 m platforms for four B.G. tracks to cater 12 car EMU rakes with double discharge facility.
  • Tripartite agreement between CIDCO, Govt. of Maharashtra and Railways and commercial development agreement between CIDCO and Railways signed on 29.08.2011

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

आगरी साहित्य संमेलन-२०११(AGRI SAHITYA SAMMELAN)


आगरी साहित्य संमेलन-२०११
AGRI SAHITYA SAMMELAN

राज्यस्तरीय दहावे आगरी साहित्य संमेलन १७ आणि १८ डिसेंबरला होणार आहे. हे संमेलन उलवा नोडमधील वहाळ या गावात होणार आहे. १७ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता उरणचे आमदार मा.श्री.विवेक पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे.

माझी तमाम आगरी साहित्य प्रेमी रसिकांना विनंती आहे की, आपल्या कामातून वेळ काढून या आगरी साहित्य संमेलनाचा जरूर आस्वाद घ्यावा.

वहाळ येथे जाणार कसे????
दादर(मुंबई), नवी मुंबईतून उरणला जाणाऱ्या सर्व बसेस या मार्गावरून धावतात. नवी मुंबई महानगरपालिकेची N.M.M.T आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची S.T या मार्गावरून धावते.
(पामबीच मार्गावरून उरण)

AGRI SAHITYA SAMMELAN
VILLAGE : WAHAL
Taluk Name : Panvel
District : Raigad
State : Maharashtra
Pin Code :410206

Wahal is a Village in Panvel Taluk in Raigad District in Maharashtra State . Wahal is 8.2 km far from its Taluk Main Town Panvel . Wahal is located 58.4 km distance from its District Main City Alibaug . It is located 20 km distance from its State Main City Mumbai .


Near By Villages of this Village with distance are Ulawe(1.5 k.m.) ,Targhar(1.9 k.m.) ,Gavhan(3 k.m.) ,Kundevahal(3.2 k.m.) ,Jasai(5 k.m.) ,. Towns Near By Panvel(8.2 k.m.) ,Uran(12.6 k.m.)

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

ठाणे आगरी महोत्सव(THANE-AGRI MAHOTSAV)










क्षणचित्रे ठाणे आगरी महोत्सव-२०१०
(वाघबीळ,ठाणे)

वरील सर्व क्षणचित्रे आहेत आगरी विकास सामाजिक संस्था(वाघबीळ,ठाणे) आयोजित आगरी महोत्सव २०१०. ७ , ८ आणि ९ मे २०१० रोजी झालेल्या या आगरी महोत्सवाला आगरी तसेच आगरी समाज जीवनावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचा तुफान प्रतिसाद लाभला.

यावर्षी देखील आगरी विकास सामाजिक संस्थेतर्फे आगरी महोत्सव २०११ चे आयोजन केले आहे. या २०११ च्या आगरी महोत्सवाला आपण भेट देऊन महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा. आगरी समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी. आपलं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी पाठीशी असुद्या.

आगरी विकास सामाजिक संस्था, वाघबीळ, ठाणे सादर करत आहे "ठाणे आगरी महोत्सव २०११".

२३ डिसेंबर २०११ : सांस्कृतिक नृत्य
२४ डिसेंबर २०११ : आगरी नाटक
२५ डिसेंबर २०११ : वाद्यवृंद


स्थळ:
वाघबीळ, ठाणे

पत्ता:
विजय लॉंन्स, वाघबीळ गाव,
घोडबंदर रोड,
ठाणे (पश्चिम).

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

आगरी दर्पण-दिवाळी अंक २०११( AGRI DARPAN)





आगरी दर्पण-दिवाळी अंक २०११

इथे आगरी दर्पण दिवाळी अंक २०११ च्या काही लेखांचे फोटो अपलोड केले आहेत. आगरी दर्पण आपल्या आगरी समाजाचा पहिला असा मासिक आहे. दर्पण या शब्दाचा अर्थ आरसा. आपल्या आगरी दर्पणने देखील आगरी समाज मनाचा आरसा नेहमीच त्यातील लेखातून, मान्यवरांच्या विचारातून उलगडला आहे. गेली १६ वर्षे आगरी दर्पणच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच खूप काही काम झालेलं आहे. आणि यापुढे देखील आगरी दर्पणच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच काम घडत राहो हीच सदिच्छा.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी



 
नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी

ना खेडं नाही, ना धड शहर नाही, अशी स्थिती महाराष्ट्रातल्या नगरांची झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील कोणत्याही तालुक्याच्या गावात जा किंवा नगरपालिका असणार्या कोणत्याही ठिकाणी. त्याला खेडं म्हणावं, तर खेड्यातली शांतता-रम्यता तुम्हाला शोधून सापडणार नाही. शहर म्हणावं तर, शहराला शोभणार्या सुविधा दिसणार नाहीत. अशा स्थितीत आपली सगळी ‘शहरे’ आज खितपत पडली आहेत.

मात्र, या अवस्थेविषयी कोणाला काही वाटत नाही. माथेरानपासून महाबळेश्वरपर्यंत सगळी देखणी शहरे जिथे बकाल झाली, तिथे पनवेल आणि उरण विषयी काय बोलणार? मुख्य म्हणजे, कोण बोलणार? आता मात्र अनेकांना अचानक कंठ फुटू लागला आहे. आजवर या शहरांच्या दुरवस्थेविषयी ‘ब्र’ न उच्चारणारे नेतेही अचानकपणे त्यांच्या विकासाविषयी बोलू लागले आहेत. जे सत्तेत आहेत ते विकासाच्या बाता मारु लागले आहेत, तर विरोधात असणार्यांना आपण मोठे क्रांतिकारक असल्याचा शोध लागला आहे. नेते अशी विकासाची वगैरे भाषा करु लागतात, तेव्हा त्याचे कारण एकच असते, निवडणूक जवळ आली आहे हे! एरव्ही, या शहरांच्या विकासापेक्षा जमिनींचे भाव, आपले उद्योगधंदे, आपले वारसदार, आपल्या संस्था, चमच्यांची फौज एवढीच काळजी नेत्यांना असते. निवडणूक आली रे आली की मग मात्र जनतेचे प्रश्न काय आहेत, हे त्यांना समजू लागते. त्यामुळे या नेत्यांपैकी प्रामाणिक कोण आणि दांभिक कोण, हे शोधणे सोपे नाही. अमाप पैसा खर्च करून सत्ता मिळवायची आणि नंतर त्या सत्तेतून पैसा मिळवायचा, हे सर्व चोर राजकीय नेत्यांचे जुने सूत्र. सर्वसामान्य माणूस मात्र या भ्रष्ट-मस्तवाल कारभाराला कंटाळला आहे.

भारत हा आता फक्त खेड्यांचा नव्हे, तर शहरांचा देश वेगाने होत असताना नवे आव्हान लक्षात घेतले पाहिजे. नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यातील १९६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर २०११ ते फेब्रुवारी २०१२ या कालावधीत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या आठ डिसेंबरला मतदान होईल आणि ९ डिसेंबरला चित्र स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरीकरणाविषयी बोलायला हवे. अपवाद वगळता, सगळ्या नगरपालिका सध्या दारिद्र्याच्या खाईत आहेत आणि त्या शहरांची अवस्था कमालीची बकाल आहे. सगळीकडे अनारोग्याचे प्रश्न आहेत. मूलभूत सुविधांच्या स्तरावर अडचणी आहेत. कोणत्याही अशा शहरात तुम्ही गेलात तर एखादाच भाग कमालीचा वर्दळीचा, गर्दीचा, दुकान-हॉटेल-टपर्यांचा दिसेल आणि बाकीचे सगळे भाग दरिद्री. जो वर्दळीचा भाग आहे, तिथेही विकास या अर्थाने काही जाणवणार नाही. उलटपक्षी सूज दिसेल. कमालीची दुर्गंधी जाणवेल. रस्त्याने चालता येऊ नये अशी स्थिती असेल. शहरातील एस.टी. स्टँडकडे तर जावेसे वाटू नये, असे चित्र. रस्त्यावर उजेड नाही, मुळात रस्ते धड नाहीत, पाणी नाही, वीज नाही, अशा असंख्य वेदनांसह जगणारी ही गावं. पण त्याला गाव म्हणायचं नाही. अशा शहरांमध्ये एवढे प्रश्न आज भेडसावत आहेत की लोक कंटाळून गेले आहेत. पण काय करणार? शहर आहे म्हणून भाडं अव्वाच्या सव्वा, घर विकत घ्यायचं तर लाखो रुपये मोजा, साध्या हॉटेलात जाणं कठीण, हॉस्पिटल तर आणखी महाग. पण, शहरात असल्याचे फायदे काहीच नाहीत. मनोरंजनाची साधने नाहीत. आपल्या मूळ गावात जाऊ शकत नाही, कारण गावं उजाड झाली. शेती आवाक्याबाहेर गेली. शहरात ही भयानकता. याला जबाबदार केवळ नगरपालिकांचे नेतृत्व नाही. त्याला आपले सरकार तेवढेच जबाबदार आहे.

नागरी विकासाला चालना देऊ शकेल, अशा धोरणाचा अवलंब आपण कधी केलाच नाही. खरे म्हणजे, ‘नागरीकरण’ असा शब्द आपण वापरतो, तेव्हा ज्या मोठ्या शहरांविषयी आपण प्रामुख्याने बोलत असतो, ती शहरे म्हणजे, ज्यांची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे ती. वर्ग एक शहरे. त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांना ‘सिटी’ असे म्हटले जात नाही. त्यांना ‘टाऊन’ असे म्हटले जाते. या छोट्या शहरांचा विकास झाला, ‘टाऊन’चा खर्या अर्थाने विकास झाला. तर मोठ्या शहरांकडे जाणारे लोंढे कमी होतील. आज स्थिती अशी आहे की, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशी शहरे प्रचंड फुगत चालली आहेत. २००१ च्या जनगणनेचा आधार घ्यायचा तर, आपल्या एकूण शहरी लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के शहरी लोकसंख्या या ‘वर्ग एक’ शहरांमध्ये एकवटली आहे. म्हणजे, हा असमतोल आहे. प्रत्यक्षात छोट्या शहरांमध्ये सर्व संधी-सुविधा आल्या तर मोठ्या शहरांवरील ताण कमी होईल. पण, असे होत नाही. लोकसंख्येचे केंद्रीकरण झाल्यामुळे शहर निर्माण होते हे खरे; पण या छोट्या शहरांमध्ये पुन्हा एखादे पोटशहर तयार होते आणि त्या संपूर्ण शहराचा विकासही शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नाही. आठ डिसेंबरला ज्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये रायगडच्या दहा पालिका आहेत. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, माथेरान, महाड, मुरुड, श्रीवर्धन, रोहा, खोपोली या त्या दहा नगरपालिका. त्याशिवाय रत्नागिरीतील पाच, सिंधुदुर्गातील तीन, नाशिकच्या सहा, धुळ्याच्या दोन, जळगावच्या बारा, अहमदनगरमधील आठ, नंदुरबारमधील एक, पुणे जिल्ह्यातील दहा, सोलापुरातील नऊ, सातार्यातील आठ, सांगलीतील चार, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ, वर्ध्यातील सहा, चंद्रपुरातील चार, भंडार्यातील तीन, गडचिरोलीतील दोन, अमरावतीतील नऊ, अकोल्यातील पाच, यवतमाळच्या आठ, बुलडाणा जिल्ह्यातील नऊ, वाशिमच्या तीन, औरंगाबादच्या पाच, बीडच्या सहा, नांदेडच्या अकरा, परभणीच्या आठ, उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ, लातूरच्या चार, जालनाच्या चार, हिंगोलीच्या तीन, नागपूरच्या नऊ, गोंदियाच्या दोन अशा नगरपालिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शहरीकरणाची गंमत अशी आहे की, मुंबई आणि मुंबईलगतचे ठाणे-रायगड, नाशिक आणि नाशिकजवळचा अहमदनगर, पुणे आणि पुणे महसूल विभागातील कोल्हापूर, त्याशिवाय औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला आणि काही प्रमाणात चंद्रपूर असे डझनभर जिल्हेच शहरीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. बाकीचे दोन डझन जिल्हे शहरीकरणापासून बरेच दूर आहेत.

पण, ज्या जिल्ह्यांनी शहरीकरणात आघाडी घेतली आहे, तेथील शहरीकरणाने निर्माण केलेल्या समस्या वेगळ्याच आहेत. वाहनांची गर्दी, रस्त्यांवरील अतिरेकी वर्दळ, अन्न-वस्त्र-निवारा या आणि सगळ्याच पायाभूत संदर्भात वाढलेला ताण, प्रदूषण, अनारोग्य, कचर्याचे ढीग, अतिक्रमण, असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य, झोपडपट्ट्या, कोसळलेली कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारीचे वाढणारे प्रमाण या सगळ्यांमुळे नगरपालिकांचा जीव घुसमटून गेला आहे. त्यांची शक्ती तोकडी पडू लागली आहे. शिवाय आव्हाने एवढी मोठी असतानाही नगरपालिकांना असणारा निधी, त्यांच्याकडील यंत्रणा याचाही विचार केला जात नाही. अनेक नगरपालिका निधीअभावी खितपत पडल्या आहेत. हे चित्र एकीकडे दिसत असतानाच, पनवेल, अलिबाग, उरण, खोपोलीसारख्या रायगड जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नगरपालिका स्थानिक मस्तवाल राजकारणामुळे देशोधडीला लागल्या आहेत. कारण, या नगरपालिकांमधील नेतृत्वाकडे सर्वसामान्य माणसाविषयी कोणतीही आच नाही. काही करावे असे त्यांना वाटत नाही. नगरसेवकांना फक्त पैसे कसे खायचे एवढीच विवंचना आणि मुख्याधिकार्यांसह सगळ्या कर्मचार्यांना त्या पैशाच्या वाटा सापडलेल्या. अगदी दरिद्री नगरपालिकेचा मुख्याधिकारीही लाखो-करोडो रुपयांची जमीन आरामात विकत घेऊ शकतो. म्हणूनच कोणतेही विकासकाम मंजूर झाले की अगोदर टक्केवारीसाठी मारामारी सुरु होते. शिवाय, ज्या ठेकेदारांना कामाच्या मंजुरीपूर्वीच ऍडव्हान्स दिला जातो, ते ठेकेदारही यांचेच भाऊबंद. सध्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेत्यांनी कोणाच्या ना कोणाच्या नावावर कंत्राटे स्वत:च घेतलेली दिसतात. अशा स्थितीत त्या नगरपालिकांची स्थिती सुधारेल, असे कोणत्या आधारावर म्हणायचे? एकीकडे मोठी वर्ग एक शहरे सगळी लोकसंख्या आपल्याकडे खेचून घेत असताना ही छोटी शहरे मात्र तेथील नागरिकांना तेथे राहण्यापासून परावृत्त करु लागली आहेत. त्यामध्ये धोरणांचे अपयश जसे आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बजबजपुरीही त्याला जबाबदार आहे.

आपल्याकडे नगरविकास मंत्रीपद सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवतात. एवढे ते मंत्रालय महत्त्वाचे आहे, याचे भान असावे. पण प्रत्यक्षात नगरविकासमंत्री नगराच्या विकासाचा प्रयत्न करीत असतात की आणखी काही वेगळ्याच गोष्टीत ते मग्न असतात, याचा विचार करायला हवा. कारण, सध्या महाराष्ट्रात ज्या क्षेत्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे, तो आहे ‘रियल इस्टेट’ किंवा ‘प्रॉपर्टी बिझनेस’! रियल इस्टेट गलिच्छ आहे आणि अव्वाच्या सव्वा भाव तेथे आहे. हा सगळा पैसा प्रामुख्याने शहरांमध्ये आहे. त्यामुळे शहरांचे नियोजन करण्याऐवजी नको त्या ठिकाणी मंत्र्यांचे लक्ष असणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री वर जे करतात, तेच खाली नगराध्यक्ष-नगरसेवक करीत असतील, तर त्यामध्ये एक ‘सुसंगती’ आहे, असेच मानायला हवे! पण मुद्दा असा की, संकुचित राजकारणातून महाराष्ट्रातील अनेक शहरांचा विकास खुंटलेला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. झोपलेले नेते अचानक जागे झाले आहेत. जातींची-गटांची बेरीज-वजाबाकी सुरु आहे. ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती’ अशा भ्रमातील कार्यकर्ते इकडून तिकडे चालले आहेत. विकासाच्या बाता सगळेच मारत आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चात राज्य निवडणूक आयोगाने यंदा वाढ केली आहे. त्यामुळे ४५ हजार एवढा जास्त खर्च उमेदवारांना यंदा करता येणार आहे. म्हणजे अ वर्गासाठी तीन लाख ४५ हजार, ब वर्गासाठी दोन लाख ४५ हजार, क वर्गासाठी एक लाख ९५ हजार असा तो खर्च आहे. आता एवढ्या खर्चात या निवडणुका खरोखर पार पाडतात का, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहेत. अशा वेळी मतदारांवर आणि प्रचारावर, तोडफोडीवर आणि पळवापळवीवर जे पैसा ओतत आहेत, त्यांच्याकडे हा पैसा कुठून आला, हा सवाल मतदारांनीच उपस्थित करायला हवा. तात्कालिक मुद्द्यांनी बिथरण्याऐवजी दीर्घकालीन विकासाची दृष्टी त्यासाठी स्वीकारायला हवी. राजकारणाचा धंदा करणार्या बिलंदर नेत्यांना मतदारांनीच सांगायला हवे, राजकारण एवढे ‘सोपे’ नाही! राजकारण ही जीवनप्रणाली आहे. ती निष्ठा आहे. मतदारांना भूलथापा मारणे आणि फसवणे आता यापुढे चालणार नाही. जो ठोस विकास करेल, त्यालाच मत मिळेल, असा निर्धार मतदारांनी केला तर महाराष्ट्रातील नगरपालिकांचे आजचे चित्र बदलू शकते.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

आपणा सर्वांचे धन्यवाद................. -AMOD PATIL(AGRI BANA)







धन्यवाद वाचक संख्या २० हजार.........................
आज आपल्या ब्लॉगची वाचक संख्या २० हजाराच्या उंबरठ्यावर आहे...............लवकरच आपण २० हजाराचा भेटींचा आकडा पार करू..............आज या २० हजाराच्या आपल्या सारख्या खूप जणांची मनापासून साथ लाभली.................. आपण दाखविलेले प्रेम आणि आपुलकी यामुळे आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद.................तसेच आपल्या ब्लॉगच्या फेसबुक पेजला दिलेला चांगला प्रतिसाद त्यामुळे पेजचे लाईक करणाऱ्यांची संख्या २००+ झाली आहे. आता म्हणाल की, धन्यवाद का?????? तर वरती त्या चित्रामध्ये अतिशय साध्या सोप्या शब्दांत त्याचं स्पष्टीकरण दिले आहे............... आपला ब्लॉग नक्की का तयार झाला याला अनेक कारणे आहेत...............२० हजाराच्या या प्रवासात खूप चांगले-वाईट अनुभव आले................त्यातील काही आज आपणास सांगताना मन आनंदित आहे.............


ब्लॉगची सुरुवात...................
२००७ साली गुगलवर मी "AGRI SAMAJ" असा सर्च दिला...................पण त्यावेळी मला अजूनही आठवतंय.............पहिल्या पेजवर ५ नंबरला अतिशय वाईट अशी सर्च सापडली.............गुगलच्या एका ग्रुपमध्ये एका पांढरपेश्या मुलीने लिहील होत................."मी इथे नवी मुंबईत बेलापूर मध्ये (*** टावर) नोकरी करते...............माझ्या ऑफिस मध्ये इथल्या स्थानिक आगरी तरुणांची संख्या खूप आहे............ते पेण, उरण, पनवेल, कर्जत, नवी मुंबई ग्रामीण भाग येथून येतात..............त्यांना म्यानर्स नावाची काही गोष्ट माहित नाही..........ऑफिस मध्ये कसं वागतात याचं त्यांना अजिबात ज्ञान नाही...............डब्यावर मासे आणतात आणि त्याचा वास ऑफिस मध्ये पसरवतात...........आम्हांला त्याचा त्रास होतो..............या घाणेरड्या माणसांना नवी मुंबई सारख्या पौश एरियातून कोणीतरी हटवा...................." नंतर काही महिन्यानंतर ग्रुप बंद झाला..............करण्यात आला...............
पण त्यानंतर मात्र डोक विचार करायला लागलं होत.................कारण त्याचवेळी ऑर्कुटवर मोठमोठे आगरी ग्रुप फक्त समाज विकासाच्या मोठमोठ्या बाता मारत होते..............त्यांच्या नजरेस ही गोष्ट त्यावेळी पडली नव्हती????? की ते फक्त उगाच टाईमपास करायचा, पोरी पटवायच्या म्हणून तिथे होते...............?????
पण नंतर माझ्या १२ वीच्या अभ्यासामुळे इंटरनेट हा विषय बाजूला राहिला..........CET च्या परीक्षेनंतर पुन्हा इंटरनेटवर रुजू झालो..............आणि फेसबुकवर अकाऊंट ओपन केलं..........२.५ - ३ वर्षापूर्वी फेसबुकवर इतकी गर्दी अजिबात नव्हती.............आंम्ही मोजकेच होतो..............म्हणजे सरासरी १०००० पोर ऑर्कुट तर फेसबुकवर फक्त १००.............मग तिथे टाईमपास करता करता लक्षात आलं हे तर लय भारी माध्यम आहे...............तिथे खूप वेळ गेला............गेल्यावर्षी जुलै मध्ये ब्लॉगर विषयी बातमी वाचली.................आणि..................."हेच ते जे आपल्याला हवं होत................बस मनात विचार पक्का..............आपण इथे सुरुवात करायची...............काहीही होवो...................पुढचे ४-५ दिवस विचार केल्यानंतर इथे ब्लॉग तयार करण्यात आला.....................आणि खऱ्या अर्थाने माझी सुरुवात झाली.................नाव मात्र रात्री झोपायच्या अगोदर सहज मनात येऊन गेलं................आणि रात्रभर त्याचा विचार चालू होता..............शेवटी ठरलं..................आगरी बोली-आगरी बाणा........."

प्रश्न अनेक होते, समाजाची असलेली वाईट ओळख पुसायची होती, त्यासाठी सर्व आगरी तरुणांनी एक व्हावे हा विचार होता..............आणि त्यातून फेसबुकवर तयार झाला आगरी बाणा ग्रुप..............त्यावेळी फेसबुकवरच्या अनेक प्रस्थापित आगरी पेजेसना रिक्वेस्ट केली होती................की चला सगले एक होऊ...................पण अपवाद वगळता अनेकांनी उत्तर दिलेच नाही.................आणि मग नंतर झाली या ऑनलाईन ग्रुपची आतापर्यंतची एकमेव मिटींग...............ही आमची शेवट नाही..............सुरुवात आहे..............आम्ही पुन्हा भेटणारच..............इथे भेट द्या-आगरी बाणाची पहिली बैठक. त्यात ठरलं होत की, आपण संघटना तयार करुया............संघटना तयार करायला हरकत नाही.................पण मला स्वतःला शैक्षणिक कामातून वेळ भेटणे अवघड आहे................आणि वरून संघटनेला नेतृत्व तुझचं हवं ही अट................काय करावं????? पण या मिटींग मधून एक शिकलो.................ऑनलाईन अनेकजण टीव टीव करतात................आम्ही समाजासाठी हे करू, ते करू..................पण जेव्हा खरोखर भेटण्याची, काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ही मंडळी गायब होतात.............आणि खरे काम करणारेच अशावेळी पुढे येतात. नुसतं ऑनलाईन सिंह, राजे बनून काही होणार नाही.....................ऑनलाइन भुंकता की डरकाळी फोडता याला काहीच अर्थ नसतो..............आज अंदाजे ४० लाख लोकसंख्या असलेल्या समाजाला आपली गरज आहे....................तुमच्या ऑनलाइन वटवट केल्याने काही होणार नाही..................समाजासाठी काही करायचं आहे तर रस्त्यावर एकत्र येण्याची तयारी दाखवा.....................मनापासून काम करणारे १०-१२ जण येणार आणि बाकी फक्त आम्हांला पण समाजासाठी काहीतरी करायचं आहे अश्या बतावण्या करणार. भविष्यात वेळ भेटेल तेव्हा पुन्हा अश्या भेटीचा योग जुळवून आणणारच.......................बोलण्यासारखं बरचं आहे.......................पुढे बोलूच.....................बाकी हे सर्व घाईघाईने लिहीत असल्याने विस्कटीत वाटू शकत..................तरी गोड मानून घ्या..................


पुन्हा  एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार..................जाता-जाता एकच विनंती...............जातीयवादी, भाषिकवादी, प्रांतवादी, धर्मवादी भेदांपासून लांब राहा.......................जो आपल्याबरोबर तो आपला...............मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, प्रांताचा असो, भाषेचा असो...............आपण सर्व भारतमातेची लेकरे आहोत.............भारत माझा देश आहे...............आणि सारे भारतीय माझे भाऊ आहेत..............


आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.