आमोद पाटील-आगरी बाणा: MTHL प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, ३ मार्च, २०१५

MTHL प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी

MTHL प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी

आज मेट्रो सेंटर, उरण येथे MTHL प्रकल्पासंदर्भात जनसुनावणीचे आयोजन केले होते त्याचे काही निवडक फोटो खाली देत आहे. शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी, २०१५ रोजी पार पडलेल्या जनसुनावणीचा वृत्तांत आपल्या ब्लॉगवर खालील लिंकवर उपलब्ध आहे. लिंक ओपन केल्यावर पूर्ण माहिती उपलब्ध.

आज झालेल्या जनसुनावणी दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ठेवावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री हे MMRDA चे अध्यक्ष असल्यामुळे आणि MTHL प्रकल्प MMRDA च्या माध्यमातून साकारला जाणार असल्यामुळे तसेच मुख्यमंत्री महोदयांना येथील प्रकल्पग्रस्तांचे जुने प्रलंबित प्रश्न अजूनही सुटले नाहीत याची माहिती देण्यासाठी बैठकीची मागणी केली. संसदेत भाषण देताना पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांना चौपट मोबदला देणार असे सांगत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारने जमीन अधिग्रहण कायद्यात फक्त १.२ चा FACTOR वापरलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाच्या २.४ पट रक्कम मिळेल. शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पूर्ण चौपट रक्कम मिळायला हवी. बाजारभाव हा सद्यस्थितीवर आधारलेला असावा. सिडको या भागातील स्वतःचे प्लॉट १-४ लाख प्रती मीटर स्क्वेअर प्रमाणे विकत आहे. परंतु सरकारचा रेडी रेकनर दर फक्त २९०० रुपये प्रती मीटर स्क्वेअर भाव हायवेवरील जमिनीसाठी आहे आणि जिरायती वैगेरे जमिनीसाठी ३०-४० लाख रुपये हेक्टर अश्या स्वरुपात आहे. सिडको जमिनी स्वस्तात घेणार आणि बिल्डर लॉबीला विकणार आणि भरमसाठ नफा मिळवणार हे चित्र कुठेतरी थांबले पाहिजे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला देखील योग्य भाव मिळालाच पाहिजे, केंद्रीय कायद्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकऱ्या मिळायलाच पाहिजे.

उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकरी






आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा