३१ डिसेंबरची नाईट...............
कदीची वाट बगत होतू ह्या दीवसाची.
रम्या, सूर्या, म्हादेव न मी चौगांनी पक्का बेत ठरवलावता.सगली तयारी केलती. बॅगपायपरचे दोन खंबे,चाकन्याला अंडी, शेंगदाने,स्टार्,बॉईल चना आनुन ठीवल व्हत.बारक्याला मटन आनाला पाटवला. सूर्याच्या शेतात बरूबर सात वाजता जमाच ठरल होत. अंगात येगलाच वारा येत व्हता.
संद्याकाली साडेसा ला सूर्याची शीटी आली. मी भायेर नींगालू. शेतात पोचलु. रम्या न म्हादेव वाटच बगीत व्हते.
आमाला बगीतल्या बगीतल्या
'थर्टीपस्ट नाईट येन्जाय ~~~' रम्यान बोंब ठोकली.
आर कूट होता र आवरा टाईम ? कती वाट बगाची तूमची ? म्हादेव ला धीर नीगना
आवर्यात बारक्या गरमागरम मटन न भाकरी झेऊन आला.
'चला चला र स्टार्ट करूया' रम्यान गलासं काडली.
पाचव जनांचे पेग भरले, यकमेकांवर आपटले.
'चेआर्स !' पयला घोट मन भरुन झेतला. चार चार करत जालत दारू आन गेली.
गप्पा सूरू झाल्या. आख्ये शेतान आमचे आमीच, कोनाचा तरास नाय न काय नाय.
साली येक मातर गंमत हाय. दारू लोकांना जवल बी आनती न पार दुश्मनी बी करवती.
रम्या न सूर्याचा छ्त्तीस चा आकडा पन आज दोगव यकत्र बसलेवते.
'तुला म्हायती र मीथन्या ह्यो माज्या भावासारका हाय.' रम्यान सुर्याचे गल्यान हात टाकला
'म्हुन माजे बा ला शीव्या दील्ल्या व्हत्या क र ?' सूर्या
'आरे गपा भ्**नो. मजा कराव आल का मारामारी र' मी समझवला
'त्या शेट्टी आन्नान जाम खून्नस दिलता र परवा' म्हादेव
'माराचा क बोल. माराचा क बोल ? आत्ता कोयता आनत बोल.' बारक्या
'आर बस ,र बस'
'बस कना बस कना ? म्हादेव ला खुन्नस दीलेला मना खपाचा नाय !' बारक्या चीतालला
'आज मी जो क हाय तो म्हादेव हाय म्हनून '
'आर आसा काय झाटलीमन लागुन गेलास र तू ? साला म्हैन्याचे शेवटी लो़कांकडे पैशे मागत फीरतस.'
'मिथ्नन्या पैसा क रां* पन कमवते. आपून ईज्जतीत जगतो बोल.'
'ज्याआयला कसली ईज्जत र ? लोकांकड पैशे मागतस क ईज्जत ?'
सगली हसाला लागली.
आस सगल चाल्लवत. दोनी खंबे रीकामे झाल्ते. रात त सरली नव्हती.
'मना आजुन हवी.' म्हादेव टाईट
'आर आता कुट मीलाची येवड्या राती ?'
'मी आन्तय. देशी चालल क ?' बारक्या
'आन कुडची बी पन मना आता दारु पायजेल' म्हादेव आयकना
बारक्या गेला भेलकांडत न शेट्टीआन्नाकडशी हातभट्टीची दोन बाटल्या हानल्या
'तूमीच पीवा बाबांनो, आमाला हातभट्टीची नको, आदिच जाम झालीय' मी न सूर्या बोल्लो, रम्याबी नाय म्हन्ला
दोनी बाटल्या म्हादेव न बारक्यानी संपवल्या.
सगली आवराआवरी करनार येवड्यान बारक्यान ऑक्क्नन ऊल्टी केली.
म्हादेव म्हन्ला 'मना कई दीस नाय रं'
सुर्या त्याचे जवल गेला त त्याचे डोल्यातून रगत येत व्हत. आमी पार घाबरलो, खाडकन ऊतरली आमची
तसाच दोगांना उचालले न पनवेला हास्पीटला त नेलं. तीत त ही गर्दी. आखा गाव लोटलावता. शेट्टीआन्नान मिथेल टाकून दारू वाडवली व्हती .
घरटी यक तरी मानूस ऍड्मीट व्हता.
बारक्या म्हादेव दोगव गेले.
बत्तीस मान्स मेली. आख्या गावच मशान झाल वत. येंन्जोय करन्याचे नादान आमी पार बरबाद झालो व्हतो.
आज थर्टीपस्ट नाईट
बारक्या न म्हादेव ची लय आटवन येतय रं.
मी आनी सूर्या गप बसलोय. शांत शांत.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा