आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी कविता-ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला? (AGRI BHASHA)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १ जुलै, २०१२

आगरी कविता-ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला? (AGRI BHASHA)




याच्या आयला ना त्याच्या आयला
याचे बना ना त्याचे बना
असा करीतच आमचा जलम जेला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?
याला खेच ना त्याला खेच
याश्या भांड ना त्याश्या भांड
भांडनानच आमचा जलम जेला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

वार लागल ना जमिनी इकल्या
बंगला बांधला ना गाऱ्या झेतल्या
येनच सगला पैसा खपोला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

मी नाय सुधरलो तरी चालल
पुन त्याला भी सुधरुन देनार नाय
आम्हाला वाटल तसा करु
आम्ही कोनला भित नाय
सुधारण्याचा कवा इचारच नाय केला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

पोरा आमचा आयकत नाय
पोरांव लक्ष देवाला टाइमच नाय
धंदा एके धंदा केला
पोरांनी मांगला त्या दिला
तरी पोऱ्या साफ बिगरला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

त्याला मिलल तशी दारु पिली
बाहेर गावान भि गावाची इज्जत घालोवली
दारुपाई आख्खे संसाराची वाट लावली
तरी काय सोरी नाय दारुला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

चला ये सगल्याचा इचार करु
थोरा तरी चांगला करु
भोग सोरु ना योग धरु
एकी करु नेकी करु
मंग छाती पुर करुन सांगु
आमचा गाव खरा सुधारला…….!

आगरी कवी-संदीप तांडेल [अलिमघर]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा