आमोद पाटील-आगरी बाणा: आमच्या गावांची सावरखेड एक गाव सारखी परिस्थिती

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, ७ जून, २०११

आमच्या गावांची सावरखेड एक गाव सारखी परिस्थिती


आजकाल भीती वाटते
परवाच माझ्या जवळच्या माणसांपैकी एकाचा मोबाईलवर मेसेज आला की,"आमच्या वरती राहणारे एक काका काल रात्री २.३० च्या सुमारास लग्न वरात आटोपून उरणवरून पनवेल कडे येत होते, तेव्हा नवघर फाटा येथे त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न दरोडेखोरांकडून करण्यात आला. गाडीवर चाकूचे वर करण्यात आले, टायरवर चाकूचे वर केले, त्यावेळी पाऊस पडत होता म्हणून गाडीच्या काचा बंद ठेवल्या होत्या. गाडीत त्याचं सर्व कुटुंब होत. थोडे पुढे गेल्यावर गाडीचा टायर देखील फुटला. पण तिथे माणसे होती, आणि हे दरोडेखोरांच्या लक्ष्यात आल्यावर ते तेथून निसटले. हल्ली अश्या खूप घटना घडत आहेत. त्या का घडत आहेत? खूप भीती वाटते."

हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. पण गेल्या काही दिवसात आपल्या परिसरात घडलेल्या घटनांमुळे भीती वाटणे स्वाभाविक आहे.

बातमी क्रमांक.
दरोडेखोरांचा हल्ला; आई-मुलगा ठार
२८ मे,२०११
"कुटुंबातील चौघांवर प्राणघातक हल्ला करून दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची खळबळजनक घटना पनवेलमधील पळस्पे भागात शनिवारी पहाटे घडली. या हल्ल्यात आई आणि मुलगा जागीच ठार झाले असून वडील आणि मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी पहाटे चिखले गावातील गणेश म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून दरोडेखोरांनी घरातील ऐवज लुटला होता.

पनवेलमधील पळस्पे येथील गणेशवाडी भागात बाळाराम फुलोरे हे पत्नी रमाबाई फुलोरे (४७), मुलगा संदीप फुलोरे (२२), मुलगी स्वप्नाली (१८) यांच्यासह राहतात. शनिवारी पहाटेच्या सुमारास फुलोरे कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. फुलोरे कुटुंबीयांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चौघांवरही प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील लाखोंचा ऐवज लुटून पोबारा केला.

शनिवारी सकाळी फुलोरे यांचे जावई घरी गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे आढळले. ते घराच्या मागील बाजूस गेले असता त्यांना पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. घरात कुटुंबातील चौघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी तत्काळ पनवेल पोलिसांना कळविले. पनवेल पोलिसांनी पाहणी केली असता रमाबाई फुलोरे आणि मुलगा संदीप हे दोघेही ठार झाल्याचे आढळून आले. तर बाळाराम फुलोरे आणि त्यांची स्वप्नाली यांना तत्काळ पनवेलमधील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दोघांचीही प्रकृती चिंतानजक आहे. एकूण किती दरोडेखोर घरात घुसले होते आणि त्यांनी किती किमतीचा ऐवज लुटून नेला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे."


बातमी क्रमांक.
ग्रामस्थांच्या हल्ल्यात दरोडेखोर यमसदनी
३० मे,२०११
"गेल्या काही दिवसांत पनवेल भागात दरोडेखोर आणि चोरांनी धुमाकूळ घातला असताना, चिखले गावात रविवारी पहाटे हाती सापडलेल्या दोघा चोरांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. त्यात एक चोराचा मृत्यू झाला असून, दुसरा जायबंदी झाला आहे.
पनवेलजवळील पळस्पे येथे शनिवारी पहाटे फुलारे कुटुंबातील चौघांवर चोरांनी प्राणघातक हल्ला करून दोघांचा जीव घेतला आणि लाखोंचा ऐवज लुटला. या पार्श्वभूमीवर चिखले गावात रविवारी पहाटे गस्त घालणाऱ्या तरुणांना बीएआरसी कॉलनीच्या गेटजवळ चार तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पाठलाग करताच ते पळ काढू लागले. त्यातील किरण शिंदे आणि राजू भोसले हे दोघे सापडले. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत किरण जागीच ठार झाला. जखमी राजूला वाशीतील महापालिका हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नवीन पनवेल पोलिसांनी अज्ञात जमावाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात याच चिखले गावातील महिलेचा कान कापून दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लुटून नेला होता
गेल्या काही दिवसांत पनवेल भागात दरोडेखोर आणि चोरांनी धुमाकूळ घातला असताना, चिखले गावात रविवारी पहाटे हाती सापडलेल्या दोघा चोरांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. त्यात एक चोराचा मृत्यू झाला असून, दुसरा जायबंदी झाला आहे. चिखले जवळील पळस्पे येथे शनिवारी पहाटे फुलारे कुटुंबातील चौघांवर चोरांनी प्राणघातक हल्ला करून दोघांचा जीव घेतला आणि लाखोंचा ऐवज लुटला. या पार्श्वभूमीवर चिखले गावात रविवारी पहाटे गस्त घालणाऱ्या तरुणांना बीएआरसी कॉलनीच्या गेटजवळ चार तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पाठलाग करताच ते पळ काढू लागले. त्यातील किरण शिंदे आणि राजू भोसले हे दोघे सापडले. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत किरण जागीच ठार झाला. जखमी राजूला वाशीतील महापालिका हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नवीन पनवेल पोलिसांनी अज्ञात जमावाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात याच चिखले गावातील महिलेचा कान कापून दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लुटून नेला होता"

तर बातमी क्रमांक. च्या आत मध्ये देखील अजून एक बातमी आहे, जी मला त्या गावात राहणाऱ्या माझ्या मित्रांकडून मिळाली. त्या दरोडेखोरांकडून धमकी देण्यात आली आहे की, तुम्ही आमचे मारलेत, आम्ही तुमचे २० मारू. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्री स्वतःच्या राहत्या घरात राहून देखील झोपणे मुश्किल झालंय.

या समस्येवर फेसबुकवर चर्चा करता अशीच परिस्थिती ठाणे,कल्याण, डोंबिवली येथी ग्रामीण भागात देखील आहे. पण पोलीस आणि राजकीय नेते मात्र एकमेकांकडे बोटे दाखवून आपापली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या घटना गेले ७-८ महिने जोम धरून आहेत. तरीदेखील आजपर्यंत पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही???????? उरण परिसरातील अनेक गावात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात घरफोडीच्या घटनांना उत आलेला असताना देखील पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका आजही आम्ही ग्रामस्थ विसरलो नाहीत. उलट धुतूम या गावात राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी ग्रामस्थांना अक्षरशः धो-धो धुतले. अनेकांची डोकी फोडली, हात तोडले. पण याची नोंद कोणीच घेतली नाही. त्यांची चुकी इतकीच होती की, संशय घेऊन त्यांनी एका गावाबाहेरच्या व्यक्तीला जो गावात संशयास्पद रीतीने फिरताना आढळला होता, त्याला बेदम मारला. हो आम्हांला माहित आहे की, हे काय"द्या"चं राज्य आहे. जर तुम्ही अगोदरच त्या चोरांना पकडून दिले असते, तर ही वेळ आली नसती. नंतरची घटना आमच्या गावातील. एका रात्री आमच्या गावातील घरे फोडली. मग दुसऱ्या दिवशी पोलीस आले पण त्यांना त्या घटनेशी लेन-देन नव्हतचं. त्यांनी तीच जुनी टेप वाजवली. कायदा हातात घेऊ नका, हे करू नका, ते करू नका. ग्रामस्थांना कृती हवी होती, भाषण नव्हे. आजतागायत ते चोर पकडले गेले नाहीत. यावरून पोलिसांची लायकी दिसून येते. आत्ता ही पनवेलची घटना झाली, त्यावेळी देखील पोलिसांनी असमर्थता दर्शविली. त्याचं म्हणने असे होते की, आम्ही त्या दरोडेखोरांच काही करू शकत नाही. ते क्रूर आहेत. तुम्ही सरकारकडून राज्य राखीव दलाची कुमक मागवावी. अहो मग तुम्ही कशासाठी??????????? फक्त हफ्ते खाण्यासाठी का?????????? राजकारणी देखील फक्त भाषणे ठोकून मोकळे झाले, आम्ही असे करू, तसे करू. अरे पण कधी???????? आमच्या लोकांचे अजून मुडदे पडल्यावर. तुमचं बर आहे. तुमच्या जवळ बॉडीगार्ड आहेत, तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुखात झोप घेत आहात. पण माझ्या सामान्य माणसंच काय????????????? आहे का कोणा राजकारण्याजवळ अथवा पोलिसांजवळ यांच उत्तर??????????? जनतेचे सेवक म्हणून मिरवताना लाज वाटायला हवी तुम्हांला.

माझ्या काही सुचना:
आलेली घटना टाळू शकत नाही, पण खबरदारीचा उपाय म्हणून सावध तरी राहू शकतो.

सावध रे...!
सध्याचे धकाधकीचे जीवन, ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेकदा बेसावधपणे वागतात. अनेकदा त्यांच्या हातून नकळत काही चुका होतात. त्याचाच फायदा गुन्हेगार उठवीत असतात. गुन्हा घडल्यावर पोलिसांत तक्रार करून उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे आपणच थोडीशी सावधगिरी बाळगली, तर फसले जाण्याचे प्रकार टाळता येऊ शकतात. त्यासाठी या काही "टिप्स'.

घराबाहेर पडताना...

- घराचे कुलूप दणकट असल्याची खात्री करावी.

- जास्त काळ बाहेर जायचे असल्यास शेजाऱ्यांना व जवळच्या पोलिस ठाण्यात त्याची माहिती द्यावी.

- बाहेरगावी कोठे जाणार, तेथील संपर्काचा क्रमांक द्यावा.

- दागिने अगर इतर मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात.

- रात्री घरातील एखादा तरी दिवा सुरू राहील अशी व्यवस्था असावी.


प्रवास करताना....

- बसमध्ये बॅगा व्यवस्थित "लॉक' करून ठेवाव्यात.

- मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा शक्‍यतो जवळच ठेवाव्यात.

- अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत.

- जादा सलगी करू पाहणाऱ्या सहप्रवाशापासून सावध राहावे.

- गर्दीत बसमध्ये चढताना आणि उतरताना खिसेकापूपांसून सावध.

- अपरिचित भागातून रात्रीचा प्रवास टाळावा.

- अनोळखी व्यक्तींना "लिफ्ट' देऊ नये.


सदासर्वदा सावधान...

- बॅंकेतून मोठी रक्कम काढताना विश्‍वासू व्यक्तीस बरोबर घेऊन जावे.

- रोख रक्कम वाहनाच्या डिकीत ठेवू नये.

- पैसे काढल्यावर बॅंकेच्या आसपास कोठेही न थांबता सरळ निघून यावे.

- रस्त्यात पडलेली चिल्लर उचलण्याचा मोह टाळावा.
- आपल्या हातातील ऐवज कोणाही परक्‍या व्यक्तीच्या हाती देऊ नये.

- महिलांनी घराबाहेर पडताना दागिन्यांची काळजी घ्यावी.

- बॅंका, पतसंस्था, पेट्रोल पंप, व्यापारी पेढ्या यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

- नोकर ठेवताना त्याची संपूर्ण चौकशी करावी.

- अडचणीच्या प्रसंगी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेचा नेमका तपशील व चोरट्यांचे वर्णन सांगावे.
किमान दक्षता
- गुन्ह्याला सामोरे जावे लागल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

- चोरट्याचे वर्णन, भाषाशैली, लकब आदी तपशील लक्षात ठेवावा.

- अनोळखी व्यक्तीशी बोलताना त्याचे वर्णन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

- रस्त्यात कोणी विनाकारण थांबवत असेल तर, थांबणे टाळावे.

- अंगावर घाण टाकूण किंवा पैसे पडल्याचे सांगून कोणी लक्ष विचलित करीत असेल तर, जवळचा ऐवज पहिल्यांदा सांभाळा.

- अंगावरील दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे.

- विनाकारण कोणी ओळख काढून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या व्यक्तीला दूर ठेवा.

आपलाच,
आमोद पाटील.
युवा.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा