आमोद पाटील-आगरी बाणा: देश उबल रहा है..... !! (stupid common man)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

देश उबल रहा है..... !! (stupid common man)



देश  उबल रहा है......................

झालेली घटना आवडली नाही.
महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित
व्यक्तींवर राग आहे,
जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे.
पण त्याचा निषेध करण्याचा हा मार्ग नव्हे असे वाटते. एका संपुर्ण
संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्याच्या अपयशाबद्दल एखाद्या व्यक्तीवर
असा हात उचलणे पटले नाही. पवारांना त्यांची चूक दाखवुन द्यायची असेल तर
आता निवडणुका आहेतच, त्यावेळी त्याची चुणुक मतदानातुन दाखवता आली असती.
ह्यातुन 'अराजक' आले आहे की काय असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही
परंतु जे काही घडते आहे ते नक्कीच योग्य नाही.
अवांतर १ : पवारांचे वय पाहता ह्या घटनेचे जास्तच वाईट वाटले.
अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच
वाईट वाटले. 'गोरे इंग्रज
जाऊन काळे इंग्रज आले' असे
म्हणणार्या एका गांधीवाद्याची अशा 'हिंसक' प्रकरणावरची 'एकच मारली का?'
अशी कुत्सित प्रतिक्रिया देखजनक आहे.
'तोबा तोबा' म्हणत हल्ल्याचा निषेध अनेक मर्हाटी नेत्यांनी केलाय.

हल्ले करून प्रश्न सुटत नाहीत.
- मनोहर जोशी.
(मग आपण्/ आपले कार्यकर्ते ईतकी वर्षे अहिंसेची खिल्ली का उडवत होते?)

हा हल्ला निषेधार्हच आहे. महाराष्ट्रात त्यांची संतापजनक प्रतिक्रिया
उमटणे सहाजिक आहे. हल्लेखोराला महागाईविरोधातच राग व्यक्त करायचा होता तर
मनमोहन सिंग यांच्यापासून सुरुवात करायची होती.
- राज ठाकरे.
(kahi divasapurvich ekmekanchi khandane kadhat hote!! Baki 2
varshapurvi asach halla Maharashtra vidhansabhet dekhil zalyach
aathaval!!)

शरद पवारांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो. अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे .
- अनंत गीते.
( १९९२ च्या दंगलीत भाग घेणार्यांनाही शिक्षा झाली पाहिजे ना?)

शरद पवारांवरील हल्ला घृणास्पद आहे'
- बाळासाहेब ठाकरे.
(har ek friend jaruri hota hai!!)

अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया होती ...
(अण्णाजी , शरद पवारको दिल्लीमे किसीने चांटा मारा..)
अण्णा:- एकही मारा क्या?
(आज तक.)
 
नन्तर आपले नेहमीचे गांधीवादाचे दळण त्यानी चालू केले. कारण कालच दारू
पिणार्याना विजेच्या खाम्बाला बांधून बदडले पाहिजे या त्यांच्या वाक्यावर
त्याना सर्वच स्तरातून 'झाडण्यात' आले होते. टीम अण्णाच काय पण खुद्द
अण्णाही बालीश वक्तव्ये कर्ण्यात मागे नाहीत आणि हे म्हणे राष्ट्राला नवे
नेतृत्व देणार....
(Gandhi topi ghalun koni Gandhivadi banat nahi!!!!)
ही नेते मंडळी देशाचे प्रश्न सोडवताना कधी एकत्र येताना दिसतात काय ?
फक्त त्यांची पगारवाढ करुन हवी असेल आणि असे काही अघटित घडले की लगेच हे
लोक एकी दाखवायला पुढे सरसावताना मात्र दिसतात !
आणि दुसरं काही नाही सापडलं म्हणून मग "हे मराठी माणूस सहन करणार नाही"
वगैरे भावनिक भडकाउ विधानं
करायची. मराठी आणि अमराठीवाद कुठुन आला यात?
बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्यांना खांबाला बांधून
झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे पाय दिसलेत.
वेनसडे मधल्या "स्ट्युपिड कॉमनमॅन"चं, "आज मे तरीके के
बारेमे नही नतीजे के बारेमे सोच रहा हुं", "लोगों मे गुस्सा बहोत है,
उन्हे आजमाना बंद किजिये", वगैरे आठवलं.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा