फेसबुक आगरी नेटिझन्स फॉर आगरी कट्टा @ वाघबीळ, ठाणे(पश्चिम)
AGRI KATTA
दि. १९ नोव्हेंबर, २०११ रोजी आगरी विकास सामाजिक संस्थेच्या पहिल्या कट्ट्या वर 'आगरी समाज काल, आज आणि उद्या' याविषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्या मध्ये प्रमुख वक्ते प्राध्यापिका कादंबरी कोठेकर, पत्रकार शशिकांत कोठेकर व कवी रामनाथ म्हात्रे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आगरी समाजाचा इतिहास पत्रकार शशिकांत कोठेकर व कवी रामनाथ म्हात्रे यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापिका कादंबरी कोठेकर यांनी आगरी समाजाच्या सद्य परिस्थिती बद्दल आपले परखड मते व्यक्ती केली व उपस्थितांची वाहवा मिळवली. आधुनिकीकरणामुळे रायगड, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आगरी लोकांच्या वस्त्या दिसेनाश्या झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा आगरी समाजामध्ये एक संघपणा नाही आहे अशी खंत उपस्थितांनी मांडली. आगरी समाज सातासमुद्रा पलीकडे गेला असून येणाऱ्या काही दिवसात आजच्या पिढीतले तरुण आपल्या समाजाचा वेगळा आसा इतिहास लिहितील अशी आशा संस्थेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या दिवसात आगरी समाज आणखी उल्लेखनीय कामगिरी करेल आशी आशा उपस्थित पाहुण्यांनी केली. कादंबरी शशिकांत कोठेकर संपादित "आगरी समाजमन" या दिवाळी अंकाच्या प्रती उपस्थितांना मोफत वाटण्यात आल्या.
"आगरी समाजा मध्ये उच्च शिक्षणात आणखी उल्लेखनीय कामगिरी यासाठी तसेच आगरी समाज आजही जुन्या वाईट रूढी व परंपरा काही प्रमाणात पाळतो या मध्ये सुधारणा होण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. " असे मत प्राध्यापिका कादंबरी कोठेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे मुख्य सूत्र संचालन लेखक व आगरी प्रभोधन कट्ट्याचे प्रमुख सल्लागार अनिल ठाकूर यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.
पहिल्या आगरी प्रभोधन कट्ट्या वर नाना पाटील, पांडुरंग पाटील, गणेश चौधरी, तुळशीराम शिंगे, भास्कर डाकी, जयवंत म्हात्रे, किशोर भोईर, संतोष भोईर, प्रकाश शिंगे व लीलाधर मणेरा इ. व्यक्ती उपस्थित होते.
"आगरी समाजा मध्ये उच्च शिक्षणात आणखी उल्लेखनीय कामगिरी यासाठी तसेच आगरी समाज आजही जुन्या वाईट रूढी व परंपरा काही प्रमाणात पाळतो या मध्ये सुधारणा होण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. " असे मत प्राध्यापिका कादंबरी कोठेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे मुख्य सूत्र संचालन लेखक व आगरी प्रभोधन कट्ट्याचे प्रमुख सल्लागार अनिल ठाकूर यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.
पहिल्या आगरी प्रभोधन कट्ट्या वर नाना पाटील, पांडुरंग पाटील, गणेश चौधरी, तुळशीराम शिंगे, भास्कर डाकी, जयवंत म्हात्रे, किशोर भोईर, संतोष भोईर, प्रकाश शिंगे व लीलाधर मणेरा इ. व्यक्ती उपस्थित होते.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा