आमोद पाटील-आगरी बाणा: स्त्री म्हणजे पायपुसणी?????????

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १ मे, २०११

स्त्री म्हणजे पायपुसणी?????????


आमच्या आगरी बाणा संघटनेच्या मुलगी वाचवा मोहिमेचा हा एक छोटासा प्रयत्न.

मी पुरुष आहे कारण.........
मी पुरुष आहे कारण मला एखाद्या तरुण मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याची ताकद आणि हक्क आहे. मी पुरुष आहे कारण माझं प्रेम नाकारणाऱ्या एखाद्या मुलीच्या अंगावर एसिड फेकण्याची माझी हिम्मत आहे. शेवटी, मी पुरुष आहे कारण मी भारतात जन्म घेतलाय, हा देश जिथे जन्मापासून मला पुरुषी अधिकार गाजविण्याचा परवाना मिळालाय. आणि या देशात माझा जन्म होऊन दिला कारण मी पुरुष आहे............

स्त्री सुरक्षितता
आत्ताच झालेल्या जनगणनेची आकडेवारी मागे आपण पाहिलीच आहे. मोठमोठ्या शहरात ही आकडेवारी ८६५-८७० च्या दरम्यान आहे. जर मोठमोठ्या शहरात ही परिस्थिती आहे तर ग्रामीण भागाची कल्पना न केलेली उत्तम. स्त्री-पुरुष समानतेच्या बाता मारायच्या पण काम काहीच नाही करायचं वर्षानुवर्षे हेच चाललय. आत्ता ते ५०% आरक्षणाचा भूत राजकारण्यांच्या बायकांसाठी आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. बलाक्तार, भ्रूणहत्या, लैगिक अत्याचार...........अश्या वाईट बातम्या वाचल्याशिवाय आपला एक दिवस तरी गेलाय का????? आपण कधीतरी अशी बातमी वाचतो की, अमुक-अमुक राज्य, अमुक-अमुक शहर स्त्रियांसाठी धोकादायक होत आहे. पण सत्य परिस्थिती ही आहे की, भारतातील कोणताही राज्यच काय तर एखाद्या गावातील गल्ली सुद्धा स्त्रीवर्गासाठी सुरक्षित नाही.

अनुभव आणि वास्तव
एका डॉक्टरच्या मुलाखतीचा काही भाग सांगत आहे,"मी एकदम स्तब्ध उभा राहतो जेव्हा एखादा पालक आपल्या मुलीला मोजण्याचं विसरतो. मी त्यांना जेव्हा असा प्रश्न करतो की, तुम्हांला मुले किती? जेव्हा माझ्या रुग्णालयात एखादी स्त्री मुलीला जन्म देते तेव्हा तीच्या माहेरच्या-सासरच्या मंडळींची तोंडे पाहण्यासारखी होतात. कुटुंबातील अनेक स्त्रिया दुखःद स्थितीत बोलत असतात की, बिचारीला मुलगी झाली...........!! मला तरी अस वाटतंय की, जगाच्या पाठीवर आपलाच देश असा असेल जिथे मुलीला जन्म देऊन देखील तिची आई खुश होत नसेल."

जन्माची लढाई
भारतीय स्रियांच्या जगण्याची लढाई आईच्या गर्भाशयातून सुरु होते. जर तीचे भाग्य खूप बलवान असतील तर ती जन्म घेते, जन्मानंतरच्या लढाईला तोंड देण्यासाठी. मी पुरावे देऊन सांगू शकतो की, एखाद्या मुलीची छेड काढणे हे एखाद्या मोबईलचा कनेक्शन घेण्यापेक्ष्या खूप सोप आहे. आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण या घटना आपण दररोज पाहत असतोच. आपण दुर्गामातेची पूजा करतो, सीतेला पुज्यनीय मानतो, पण आपण मुलींचा आदर करण्याचं सोयीस्कररीत्या विसरतो. ही चूक, आपल्या नवीन पिढीची नाही. याची पाळेमुळे आपल्या जुन्या भारतीय समाजातच आहेत. पुरुषसत्ताक पद्धतीचा स्वीकार करताना काही अनिष्ट गोष्टी त्याच्यात घुसविण्यात आल्या आहेत, त्याचा आपण विचार देखील करत नाहीत.

बदल हवा आहे
आपल्या देशातील लक्ष्मी केवळ मंदिरातच उरली आहे का? आपल्या देशातील सरस्वती केवळ पुस्तकी ज्ञानात उरली आहे का? भारतीय मातीतल्या दुर्गेला न्याय कधी मिळणार?बदल तेव्हाच घडू शकतील जेव्हा तुम्हा आम्हांला बदल घडविण्याची इच्छा असेल. आपल्या समाजाने देखील काही गोष्टीचं भान राखण्याची गरज आहे. सर्वानी हे समजण्याची गरज आहे की, आपणा सर्वाना आई,आजी,काकी,बायको,बहिण अश्या सर्वजणी आहेत. जर स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली नाही तर पुढची शिकार कदाचित तुमच्या घरातील एखादी स्त्री असू शकते.............

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा