(वरील सर्व फोटो गेल्यावर्षी आम्ही गेलो होतो त्यावेळचे आहेत)
PLACE:
Pandavkada Waterfall,
Kharghar, Panvel,
Raigad.
पांडवकडा साद घालतोय...........
पायथ्यापासून ते अगदी माथ्यापर्यंत अंगावर हिरवी शाल लपेटलेला. उंच कडेकपारीतून अंगावर जणू शॉवरचा सपाटून मारा करणारा. सर्वागात उत्साहाच वार संचारण्यास भाग पाडणारा. महाभारतील पांडवांच ऐतिहासिक वास्तव्य सांगणारा. ‘पांडवकडा’ पावसाचे तुषार अंगावर झेलत निसर्गाची कुस शोधणा-या पर्यटकांना साद घालू लागला आहे. उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याची फेसाळलेली शुभ्र आणि थंड धार अंगावर घेत मस्तीत भिजत राहणे, यापेक्षा वेगळा असा आनंद कोणता! नवी मुंबईतील "नायगारा" म्हणून प्रसिध्द असणाऱ्या खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर आता गर्दी होऊ लागली आहे.
जुन-जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळताच मुंबई, नवी मुंबई व रायगडमधील पर्यटक येथे येतात. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पोलीस आणि सिडकोने बंदी घातली होती, परंतु हा नैसर्गिक धबधबा पर्यटकांना खुला करण्यासाठी काही कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश मिळाले. दोन वर्षांपासून पर्यटक या धबधब्याचा आनंद घेत आहेत. बेलपाडा व खारघर टेकडीच्या पायथ्याशी भारती विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील विद्यार्थी पावसाळ्यात छोट्या-मोठ्या डोंगरदऱ्यातील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घेत असत. काही ग्रामस्थांकडून या परिसरात पांडवकडा असल्याची माहिती त्यांना मिळाली. तरुणाईची गर्दी येथे होऊ लागल्यावर त्याचे नाव सर्वतोमुखी झाले.
जुन-जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळताच मुंबई, नवी मुंबई व रायगडमधील पर्यटक येथे येतात. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पोलीस आणि सिडकोने बंदी घातली होती, परंतु हा नैसर्गिक धबधबा पर्यटकांना खुला करण्यासाठी काही कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश मिळाले. दोन वर्षांपासून पर्यटक या धबधब्याचा आनंद घेत आहेत. बेलपाडा व खारघर टेकडीच्या पायथ्याशी भारती विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील विद्यार्थी पावसाळ्यात छोट्या-मोठ्या डोंगरदऱ्यातील धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद घेत असत. काही ग्रामस्थांकडून या परिसरात पांडवकडा असल्याची माहिती त्यांना मिळाली. तरुणाईची गर्दी येथे होऊ लागल्यावर त्याचे नाव सर्वतोमुखी झाले.
ओळख पांडवकड्याची....
सिडकोने खारघरचा विकास हाती घेतल्यावर खारघर शहराची निसर्गरम्य शहर अशी ओळख करून देताना पांडवकड्याचाही उल्लेख करावा लागतो. या धबधब्याशेजारी धामोला हा आदिवासी पाडा आहे. पावसाळ्यात येथे सव्वाशे फुटावरून डोंगरावरून पानी खाली कोसळते. पनवेल, तळोजा, खारघर परिसरातून हे विलोभनीय दृश्य दिसते. हा धबधबा जणू सर्वाना साद घालत असतो. दहा-पंधरा वर्षापासून येथे पर्यटकांची गर्दी असते. धबधब्याच्या मध्यभागी डोंगरात सगळीकडे काळाकुट्ट अंधार असलेली मोठी गुंफा आहे. या गुंफेतून मुंब्रा, कल्याणपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. धामोला पाड्यातील काही मंडळीनी दीड-दोनशे फुट आत जाऊन पाहिले असल्याचे सांगतात. आत मिट्ट काळोख असून काहीच दिसत नाही. पूर्वी या गुंफात पाच पांडवांनी वास्तव्य केल्याचेही सांगितले जाते. गुंफात जाऊन शांत बसल्यास मुंब्रा येथून जाणाऱ्या रेल्वेचा आवाज देखील कानी पडतो. पूर्वी पांडवकडा म्हणण्याऐवजी आगरी भाषेत "पंडोकरा" असे म्हटले जात असे. हिरवे हिरवे गार गालिचे.......
पांडवकड्याला जाणार असाल तर काही सुचना:
१. पांडवकड्याला जाताना घरात सांगून निघणे.
२. ७-८ जणांच्या ग्रुप बरोबरच जाणे. एकट्या-दुकट्याने जाण्याची शहाणपणा करू नये.
३. बरोबर मोबाईल बाळगणे. खूप डोंगरात असला तरी मोबाईलला खूप रेंज असते. अडीअडचणीच्या वेळी कामास येईल.
४. चप्पल घालून जाणे. कारण कच्ची पाऊलवाट असल्याकारणाने पाय मातीत रुतून बसण्याचा धोका आहे. आणि बूट असतील तर ते अधिक रुतून खराब होतील. तुटलेल्या चपला तिथेच टाकून स्वतःची अक्कल विकायला काढू नये. निसर्गाला घाण करण्याचा तुम्हांला अधिकार नाही. मुकाट्याने ती चप्पल ब्यागेत टाकावी आणि पुढचा मार्ग धरावा.
५. प्रत्येक पाऊल जपून टाकावे. कारण वाट खूप निसरडी आहे. आणि खाली जागो-जागी भले मोठे दगड आहेत. पडलात तर खूप महागात पडेल.
६. वरती सांगितल्या प्रमाणे दोन जणांनी येण्याचा शहाणपणा दाखवू नये. काही प्रेमवीर जर "त्यांच्या" "तिला" स्वर्ग दाखवायला घेऊन येणार असतील, तर तुमच्या स्वर्गाचा मार्ग नरकातून जातो याची नोंद असावी.
७. ही आपली खाजगी प्रॉपर्टी नाही याचं भान असुद्या. बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचे वेष्टन तेथे टाकू नये. तो कचरा स्वतःच्या ब्यागेत टाकावा.
८. धबधब्याच्या प्रवाहात उतरताना पाण्याचा जोर किती आहे, हे जाणून घ्या. प्रवाहाला खूप वेग असल्यास वाहून जाण्याची शक्यता असते. या धबधब्यांच्या प्रवाहात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
९. धबधब्याच्या पाण्याचा रंग बदलून पाणी गढूळ होऊ लागले, पाण्याबरोबर बारीकबारीक दगडगोटे वाहून येऊ लागले, तर हा पाण्यातून बाहेर पडण्याचा इशारा आहे हे लक्षात घ्या. जिथे आपण बसलो आहोत, तिथे पाऊस नसला तरी धबधब्याच्या वरच्या भागात मोठा पाऊस होत असल्यास अचानक पाण्याचा लोंढा येण्याचा संभव असतो.
९. धबधब्याच्या पाण्याचा रंग बदलून पाणी गढूळ होऊ लागले, पाण्याबरोबर बारीकबारीक दगडगोटे वाहून येऊ लागले, तर हा पाण्यातून बाहेर पडण्याचा इशारा आहे हे लक्षात घ्या. जिथे आपण बसलो आहोत, तिथे पाऊस नसला तरी धबधब्याच्या वरच्या भागात मोठा पाऊस होत असल्यास अचानक पाण्याचा लोंढा येण्याचा संभव असतो.
१०. पाणी वाढल्यामुळे एखाद्या ठिकाणी अडकून पडल्यास पाणी उतरेपर्यंत सुरक्षित जागी थांबा. जास्त वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल, मात्र मोठ्या प्रवाहातून पलीकडे जाण्याचे साहस अंगावर बेतू शकते.
११. भुसभुशीत मातीचा अंदाज न आल्याने खाली घसरण्याच्या घटना घडू शकतात.
१२. नाला, ओढा पार करताना एकमेकांचा हात धरून, साखळी करून प्रवाह ओलांडावा.
१२. नाला, ओढा पार करताना एकमेकांचा हात धरून, साखळी करून प्रवाह ओलांडावा.
१३. ग्रुपमधील सगळ्यांनी पाण्यात उतरू नये. स्वत:च्या तसंच, सोबतच्या सामानाच्या सुरक्षेसाठी एक-दोन जणांनी काठावर थांबणं आवश्यक आहे.
१४. अशा ठिकाणी कपड्यांचं भान आवश्यक आहे. मुलीनी विशेष काळजी घ्यावी. ज्या ग्रुप बरोबर जाणार आहात त्या ग्रुप मधली पोरं ओळखीची असावीत. किरकोळ शेरेबाजी, कमेंट्सचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची उदाहरणं घडतात. वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी हे भान राखणं आवश्यक आहे.
१५. निसर्गाचा आदर राखून वागणं आवश्यक आहे. नदीच्या परिसरात कचरा टाकू नये, आपल्यासोबतचे बिस्किट, चॉकलेटचे रॅपर आपल्यासोबत परत आणावेत.
१६. दारूच्या बाटल्या पिऊन तमाशे करू नयेत. स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालाल. पांडवकडा हे दारू पिण्याचे ठिकाण नाही. त्या बाटल्या तुमच्या घरी जाऊन आई-वडिलांसमोर ढोसाव्यात आणि तुमचे नको ते रंग दाखवावेत.
१७.. दुदैर्वाने काही अपघात झाल्यास स्थानिक गावकऱ्यांना, गावातील पोलीस पाटीलाला, जवळील पोलीस स्टेशनला कळवावे. अशा वेळी काही जणांनी तरी घटनास्थळी थांबावे.
आपलाच,
आमोद पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा